AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

700 चित्रपटांमध्ये केलं काम, 70 वर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य, पण एका कानशिलातने उध्वस्त झालं करिअर, शेवटी…

बॉलिवूडमधील या अभिनेत्रीने केलंय 700 चित्रपटांमध्ये काम. 70 वर्षे केलं चाहत्यांच्या मनावर राज्य. पण एका कानशिलातने बदललं नशीब. शेवटी...

700 चित्रपटांमध्ये केलं काम, 70 वर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य, पण एका कानशिलातने उध्वस्त झालं करिअर, शेवटी...
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 28, 2026 | 6:46 PM
Share

Bollywood Actress : बॉलिवूडमध्ये काही कलाकार असे असतात की त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर कायमची उमटते. अशाच प्रभावी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ललिता पवार. त्यांच्या निगेटिव्ह भूमिकांनी प्रेक्षकांना अक्षरशः घाबरवून सोडले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण त्यांच्या पडद्यावरील खलनायिकेच्या भूमिकांमुळे त्यांना ओळखू लागले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर एक नजर टाकूयात.

ललिता पवार यांचा जन्म महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात झाला. त्यांचे खरे नाव अंबा लक्ष्मणराव सगुण असे होते. त्यांचे वडील रेशीम व्यापारी होते तर आई गृहिणी होती. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यांच्या कलागुणांची जाणीव झाल्यावर त्यांच्या पालकांनी त्यांना चित्रपटसृष्टीत येण्याची परवानगी दिली.

अवघ्या नऊव्या वर्षी त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. 1928 साली प्रदर्शित झालेल्या मूकपट Raja Harishchandra मधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. त्या काळात भारतीय चित्रपटसृष्टी मूकपटांच्या टप्प्यात होती. मात्र लहान वयातही त्यांनी आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवला. बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले आणि इथूनच त्यांच्या दीर्घ कारकिर्दीची सुरुवात झाली.

अपघाताने बदलले आयुष्य

काळाच्या ओघात ललिता पवार यांनी नायिका बनण्याचे स्वप्न पाहिले. मात्र 1942 साली प्रदर्शित झालेल्या Jung-E-Azadi या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेल्या एका अपघाताने त्यांचे आयुष्यच बदलून टाकले. एका सीनमध्ये सहकलाकाराने त्यांना थप्पड मारायची होती. तो फटका इतका जोरात बसला की त्या खाली पडल्या. त्यांच्या डोळ्याची नस दुखावली गेली आणि शरीराच्या एका भागाला लकवा मारला. या घटनेनंतर त्यांना काही वर्षे चित्रपटांपासून दूर राहावे लागले. नायिका होण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले.

मात्र त्यांनी हार मानली नाही. स्वतःला नव्या पद्धतीने साकारत त्यांनी साइड रोल आणि खलनायिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रभावी आणि कडवट भूमिकांमुळे त्या ‘अत्याचारी सासू’ आणि ‘नकारात्मक स्त्री पात्र’ म्हणून प्रसिद्ध झाल्या.

विशेषतः Ramayan या मालिकेत त्यांनी साकारलेले मंथरेचे पात्र त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरले. या भूमिकेमुळे त्या घराघरांत ओळख मिळाली आणि त्यांच्या खलनायिकेची प्रतिमा अधिक ठळक झाली.

विक्रमी कारकीर्द आणि अखेरचा प्रवास

ललिता पवार यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत सुमारे 700 चित्रपटांमध्ये काम केले. हिंदी, मराठी आणि गुजराती भाषांतील चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका साकारल्या. अभिनय क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानामुळे त्यांचे नाव सर्वाधिक काळ अभिनय करणाऱ्या महिला कलाकार म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले.

Follow Us
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा.
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य.
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?.
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला.
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका.
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार.
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले.
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला.