AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशा लोकांसाठी जागा नाही..; ‘ये रिश्ता..’चा वाद टोकाला, मुख्य कलाकारांना काढून टाकल्यानंतर निर्मात्यांची प्रतिक्रिया

स्टार प्लस वाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’चा वाद टोकाला पोहोचला आहे. या मालिकेत अरमान पोद्दार आणि रुही बिर्ला या मुख्य भूमिका साकारणारे कलाकार शहजादा धामी आणि प्रतीश्रा होनमुखे यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

अशा लोकांसाठी जागा नाही..; 'ये रिश्ता..'चा वाद टोकाला, मुख्य कलाकारांना काढून टाकल्यानंतर निर्मात्यांची प्रतिक्रिया
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील मुख्य कलाकारांची एग्झिटImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 20, 2024 | 10:01 AM
Share

मुंबई : 20 मार्च 2024 | स्टार प्लस वाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या दोन कलाकारांना तडकाफडकी काढून टाकण्यात आलं आहे. त्यांच्या जागी आता मालिकेत नवीन कलाकार दिसणार आहेत. ‘ये रिश्ता..’मध्ये अरमान आणि रुहीची भूमिका साकारणाऱ्या शहजादा धामी आणि प्रतीक्षा होनमुखे यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या दोघांना अचानक मालिकेतून काढून टाकल्याने चाहतेसुद्धा चकीत झाले आहेत. यावर आता निर्माते राजन शाही यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, “कलाकारांसोबत माझे अनेकदा वाद होतात. मात्र शोपेक्षा अधिक महत्त्वाचं कोणीच नाही, निर्माताही नाही. मी माझ्या मालिकेतील कलाकारांच्या कामाचं नेहमीच कौतुक करतो. मात्र अनेकजण असा चुकीचा दावा करतात की त्यांना 18 तास शूटिंग करावी लागते. असं दररोज घडत नाही, कधीतरी त्यांना अधिक तास थांबून काम करावं लागतं. प्रेक्षक त्यांच्या लाडक्या कलाकारांबद्दल असा विचार करतात की ते सतत कामच करत असतात. मात्र याबाबतीत मी नेहमीच स्पष्ट केलंय. मी असा एकमेव निर्माता असेन जो त्याच्या कलाकारांच्या मेहनतीचं कौतुक करायला सर्वांत आघाडीवर असेल. पण माझ्यासोबत जर कोणी वाईट वागत असेल किंवा मला त्रास दिला जात असेल तर मी ते सहन करणार नाही.”

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत नुकतीच जनरेशन लीप दाखवण्यात आली होती. त्यानंतर मुख्य भूमिकांसाठी शहजादा आणि प्रतीक्षा यांची निवड करण्यात आली होती. मात्र शहजादा धामी आणि प्रतीक्षा होनमुखे हे दोघं एकमेकांना डेट करू लागले होते. या दोघांमधील जवळीक वाढली होती आणि त्याचा परिणाम मालिकेच्या कामावर होऊ लागला होता. सेटवरील त्यांच्या अनप्रोफेशनल वागणुकीमुळे आधी क्रिएटीव्ह टीमशी वाद झाला. नंतर हा मुद्दा थेट प्रॉडक्शन हाऊसपर्यंत पोहोचला. दोघांच्या अनप्रोफेशनल वागणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय.

या मालिकेत आता गर्विता सधवानी रुहीची भूमिका साकारणार आहे. तर रोहित पुरोहितने शहजादाची जागा घेतली आहे. गर्विताने याआधी ‘बातें कुछ अनकहीं सी’ या मालिकेत मृणालची भूमिका साकारली होती. तर श्वेता तिवारीच्या ‘मैं हूँ अपराजिता’मध्ये ती नियाच्या भूमिकेत होती. आता अरमान आणि रुहीच्या भूमिकेत हे नवीन कलाकार प्रेक्षकांची मनं जिंकू शकतील का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.