AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीत नारळ पाणी प्यायला हवे का? काय आहेत फायदे?

हिवाळ्यात नारळाचे पाणी प्यायला काही अडचण नाही. हे शरीर हायड्रेटेड ठेवते, त्वचा कोरडी होण्यापासून वाचवते. वजन नियंत्रणात ठेवते आणि शरीराला ऊर्जा प्रदान करते. त्यामुळे हिवाळ्यातही नियमितपणे नारळपाणी प्या आणि आरोग्य उत्तम ठेवा.

थंडीत नारळ पाणी प्यायला हवे का? काय आहेत फायदे?
नारळाचं पाणीImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Dec 15, 2024 | 3:02 PM
Share

नारळाचं पाणी आरोग्यासाठी चांगलं असतं. आजारपण असो वा नसो नारळ पाणी पिणं कधीही चांगलं. आजारी पडल्यावर डॉक्टरही नारळ पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. पण नारळ पाणी कोणत्या सीजनमध्ये प्यावे हे अनेकांना समजत नाही. थंडीच्या दिवसात म्हणजे हिवाळ्यात नारळ पाणी प्यायलं पाहिजे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यावरच आज आपण प्रकाश टाकणार आहोत. नारळ पाणी हिवाळ्यात प्यावं की नाही? त्याचे काय आहेत फायदे आणि तोटे? चला तर मग जाणून घेऊया…

केवळ आजारी असताना आणि उन्हाळ्यातच नारळ पाणी प्यायलं पाहिजे असा अनेकांचा समज आहे. नारळ थंड असते. त्यामुळे उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने उष्माघातासह अनेक आजारापासून दिलासा मिळतो असंही असंही अनेकांना वाटतं. पण उन्हाळ्यातच नव्हे तर तुम्ही थंडीच्या दिवसातही नारळ पाणी पिऊ शकता. हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे असंख्य फायदे आहेत. ते समजून घेतले पाहिजे.

नो डिहायड्रेशन

हवेतील आर्द्रता सातत्याने कमी होऊन हिवाळ्यात हवेतील ओलावा कमी होतो. त्यामुळे डिहायड्रेशन (शरीरात पाणी कमी होणे) होण्याचा धोका वाढतो. अशावेळी जर तुम्ही रोज नारळाचे पाणी पित असाल, तर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या कधीच होणार नाही. हिवाळ्यात नारळाचे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते.

त्वचा कोरडी होत नाही

हिवाळ्यात अनेक लोकांना त्वचेशी संबंधित समस्या ग्रास्तात. त्वचेचा कोरडेपणा ही त्यातील महत्त्वाची समस्या असते. नारळाचे पाणी त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. यातील अँटीऑक्सिडंट्स शरीराला थंड आणि तापापासून दूर ठेवण्यास मदत करते. त्याचप्रमाणे, नारळाच्या पाण्यात असलेल्या फायबर्स तुमच्या पाचन प्रणालीला देखील उत्तम प्रकारे कार्यरत ठेवतात.

शरीराच्या तापमान नियंत्रणात

नारळाचे पाणी शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त असते. त्यामुळे हिवाळ्यातही त्याचा फायदा होतो. वजन वाढत असल्याबद्दल तुम्ही चिंतीत असाल तर नारळाचे पाणी प्यायल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहते. कारण त्यात कॅलरीज अधिक असतात.

चहा आणि कॉफी सुटू शकेल

नियमितपणे नारळाचे पाणी प्यायल्यास तुमची चहा आणि कॉफीचे पिण्याची सवय सुटेल. परिणामी तुमचे कॅफिनचे सेवन कमी होईल. शरीरासाठी ते उत्तमच ठरेल. यामध्ये पुरेशी प्रमाणात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतो. पोटॅशियम शरीरातील सोडियमच्या स्तराचे संतुलन राखण्यास मदत करते आणि रक्तदाबाचे नियंत्रण सुधारते.

ऊर्जा वृद्धी

नारळाच्या पाण्यात असलेले नैसर्गिक शर्करा आणि इलेक्ट्रोलाइट्स शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. हिवाळ्यातही त्याची ऊर्जा वाढवण्याची भूमिका महत्वाची असते. ते शरीराला ताजेतवाने ठेवते.

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.