AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्या पदार्थांमध्ये मीठ वरून टाकून खाऊ नये? आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, जाणून घ्या

जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ वापरले जाते. पण जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्याने आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात. कोणत्या पदार्थांमध्ये मीठ टाकून खाऊ नये, हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

कोणत्या पदार्थांमध्ये मीठ वरून टाकून खाऊ नये? आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, जाणून घ्या
Salt
| Edited By: Jitendra Zavar | Updated on: Apr 11, 2025 | 1:57 PM
Share

मीठाशिवाय जेवणाची चव चांगली लागत नाही. मीठ केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर शरीरात आयोडीनची कमतरता देखील भरून काढते. पण आपल्यापैकी काही लोकांना जास्त मीठ खाण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. ज्याप्रमाणे पोषक तत्वांच्या कमतरतेचा आरोग्यावर परिणाम होतो, त्याचप्रमाणे शरीरात त्यांच्या वाढत्या प्रमाणाचाही परिणाम होतो.

आहारतज्ज्ञ मोहिनी डोंगरे सांगतात की लोकांना काही पदार्थांमध्ये मीठ टाकून त्याचे सेवन करतात. पण आपल्या आरोग्याशी संबंधीत असे काही पदार्थ असतात ज्यामध्ये वरून मीठ टाकून खाऊ नयेत असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण पदार्थांमध्ये वरून मीठ टाकून त्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तर आजच्या या लेखातून आपण याबाबतीत आहारतज्ज्ञाकडून जाणून घेऊया …

फळांचे ज्यूस

लोकांना अनेकदा उसाचा रस आणि मौसंबीचा ज्यूस यामध्ये मीठ टाकून प्यायला आवडते. मात्र आरोग्याच्या दृष्टीने या ज्यूसमध्ये मीठ टाकून प्यायल्याने आपल्याला त्याचे पोषक घटक मिळत नाहीत. तसेच शरीरात मीठाचे प्रमाण वाढते. विशेषतः फळांच्या ज्यूसमध्ये मीठ टाकून पिऊ नका, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

फ्रूट चाट

तज्ज्ञ सांगतात की फ्रूट चाट घात असताना सुद्धा मीठ घालून खाऊ नये. जर तुम्ही फळांवर मीठ घालून खाल्ले तर शरीरात पाणी टिकून न राहण्याची समस्या उद्भवू शकते. यामुळे शरीरात जळजळ होऊ शकते. तसेच फ्रूट चाटवर वरून मीठ टाकून खाल्ल्याने रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे मीठाचे जास्त सेवन करू नये.

सॅलड

अनेकांना सॅलडमध्ये मीठ टाकून खायला आवडते. पण यामुळे शरीरात सोडियमची पातळी वाढू शकते. सॅलड खाल्ल्याने शरीराला फायबर आणि पाण्याचे प्रमाण मिळते. पण तुमच्या आहारात जेव्हा सॅलडचे समावेश करून त्यावर मीठ टाकून खाल्ल्याने शरीरात समस्या उद्भवू शकते. विशेषतः, कच्च्या भाज्यांमध्ये मीठ टाकून खाऊ नका.

मर्यादित प्रमाणात मीठाचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की चिप्स, नूडल्स आणि इतर जंक फूडमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, ते न खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
सावधान! अशुद्ध खाद्यपदार्थांवर ब्रँडेड टॅग? छापा टाकताच फॅक्टरीत भयंकर
सावधान! अशुद्ध खाद्यपदार्थांवर ब्रँडेड टॅग? छापा टाकताच फॅक्टरीत भयंकर.
महागाईविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार! नवी मुंबईत रस्त्यावर...
महागाईविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार! नवी मुंबईत रस्त्यावर....
नागरिकांनो पुढील 48 तास महत्त्वाचे! पावसामुळे अंधेरीसह उपनगरीय भागात..
नागरिकांनो पुढील 48 तास महत्त्वाचे! पावसामुळे अंधेरीसह उपनगरीय भागात...
अखिल भारतीय महापौर परिषदेच्या अध्यक्षपदी रितू तावडेंची वर्णी
अखिल भारतीय महापौर परिषदेच्या अध्यक्षपदी रितू तावडेंची वर्णी.
कोल्हापूर हादरलं! बॉयफ्रेंडसह 4 जणांचं तरुणीसोबत भयंकर कृत्य,
कोल्हापूर हादरलं! बॉयफ्रेंडसह 4 जणांचं तरुणीसोबत भयंकर कृत्य,.
एका क्षणात होत्याचं नव्हतं!; एसटीच्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला
एका क्षणात होत्याचं नव्हतं!; एसटीच्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला.
मॉन्सूनच्या आधीच मुंबईत पावसाची एंट्री! उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा
मॉन्सूनच्या आधीच मुंबईत पावसाची एंट्री! उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा.
मुंबईकरांनो सावधान! पावसामुळे होतोय वेस्टर्न एक्सप्रेसवेवर भीषण अपघात
मुंबईकरांनो सावधान! पावसामुळे होतोय वेस्टर्न एक्सप्रेसवेवर भीषण अपघात.
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत.
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,.