AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात रोज रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे 5 फायदे

हिवाळ्यात अनेकदा हंगामी आजारांना आपल्याला समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, या समस्यांना सामोरे जाण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे रोज सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास कोमट पाणी प्यावे. यामुळे तुमचे अनेक आजार आपोआप बरे होतील.

हिवाळ्यात रोज रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे 5 फायदे
| Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 7:52 PM
Share

हिवाळा हा ऋतू अनेकांचा आवडता ऋतू आहे, पण हिवाळा ऋतू म्हंटल कि ऋतूबरोबर येणारे आजार किंवा आरोग्याच्या समस्याही आपल्या सगळ्यांना सतावतात. हिवाळ्यात अनेकांना हाडांच्या वेदना वाढतात. इतकंच नाही तर या ऋतूत वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम आपल्या त्वचेवर तसेच पचनसंस्थेवर होतो. हे वारे आपले रक्ताभिसरण कमी करतात, ज्यामुळे शरीराच्या सर्व कार्यांवर परिणाम होतो.

अशावेळी थंडीमुळे होणारे त्रास टाळण्यासाठी तुमच्या दिनचर्येत थोडाफार बदल करून आरोग्याचे स्वास्थ चांगले ठेऊ शकतो. रोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाणी प्यायल्यानेही तुम्ही निरोगी राहू शकता. दररोज सकाळी गरम पाणी पिणे आपल्या शरीरासाठी अनेक समस्यांमध्ये फायदेशीर ठरू शकते. जाणून घेऊया याच्या फायद्यांविषयी.

कोमट पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते

थंडीच्या दिवसात गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. यापैकी एक म्हणजे गरम पाणी पिण्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. खरं तर थंड हवामानामुळे सकाळी आपल्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया मंदावते. अशावेळी सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणी प्यावे. यामुळे तुमचे रक्ताभिसरण वाढेल आणि तुमचे शरीर उबदार राहील.

गरम पाणी शरीराला डिटॉक्सिफाई करते

तुम्ही सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने तुमचे शरीर डिटॉक्सिफाई होते. सकाळी पाणी प्यायल्यास शरीरात जमा झालेली सर्व घाण साफ होते. तसेच गरम पाणी प्यायल्याने तुमचं पोट तर स्वच्छ राहतंच शिवाय रक्तही स्वच्छ होतं. गरम पाणी पिण्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येतो.

शरीरातून आळस दूर करते

थंडीच्या दिवसात अनेकांना सुस्ती येते त्यामुळे अंथरुणातून बाहेर पडावस वाटत नाही. अंगात आळस भरतो. कारण हिवाळ्यात आपल्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया मंदावलेली असल्याने आपल्याला सुस्ती येते. यासाठी थंडीच्या दिवसात रोज सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे. सकाळी फ्रेश दिसायचं असेल तर आळशीपणा दूर करण्यासाठी गरम पाणी घ्या.

चमकदार त्वचा मिळविण्यासाठी कोमट पाणी प्या

हिवाळाच्या दिवसांमध्ये थंड वाऱ्यामुळे आपली त्वचा कोरडी पडते. यावर मात करण्यासाठी दररोज गरम पाणी प्यावे. खरं तर गरम पाण्यामुळे रक्ताभिसरण लगेच वाढते, ज्यामुळे शरीर लवकर डिटॉक्स होते. यामुळे तुमची त्वचा चमकदार होते म्हणून सकाळी सर्वप्रथम पाणी गरम करून प्यावे.

कोमट पाण्यामुळे सायनसपासून आराम मिळतो

थंडीच्या दिवसात बाहेरील वातावरण थंड असल्याने अनेकदा सायनस असलेल्या लोकांना याचा खूप त्रास होतो. खरं तर हिवाळ्यात अनेक दिवस नाक आणि डोकेदुखीची समस्या कायम राहते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी दररोज सकाळी गरम पाणी प्या कारण गरम पाणी सायनसायटिसची लक्षणे प्रभावीपणे कमी करते, ज्यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.