AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिटॉक्स वॉटर पिताय? तज्ञांकडून ते पिण्याची योग्य पद्धत जाणून घ्या अन्यथा…

डिटॉक्स वॉटर आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे विविध प्रकारची फळे, भाज्या आणि हर्ब्स पाण्यात बराच वेळ ठेऊन त्यानंतर त्याचे सेवन केले जाते. पण जर ते जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने सेवन केले तर ते आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते. चला याबद्दल तज्ञांकडून जाणून घेऊया

डिटॉक्स वॉटर पिताय? तज्ञांकडून ते पिण्याची योग्य पद्धत जाणून घ्या अन्यथा...
| Edited By: | Updated on: Mar 21, 2025 | 3:58 PM
Share

आजकाल लोकं त्यांच्या आरोग्याबद्दल खूप जागरूक झाले आहेत. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य आहार घेण्यापासून ते व्यायाम करणे आणि अनेक पद्धतींचा अवलंब करताना आपण पाहतोच, त्यापैकी एक म्हणजे डिटॉक्स वॉटर पिणे. त्याच्या नावाप्रमाणेच, ते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डिटॉक्स वॉटर शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. याशिवाय, ते वजन कमी करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते. शरीराला जास्त काळ हायड्रेट ठेवण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे आणि जेव्हा शरीर हायड्रेटेड राहते तेव्हा ते आपली त्वचा निरोगी ठेवण्यास देखील मदत होते. त्यामुळे ते त्वचेला हायड्रेट ठेवते आणि पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि मुरुम यासारख्या समस्या कमी होतात.

डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी, विविध प्रकारची फळे, भाज्या आणि हर्ब्स पाण्यात ठेवून हे पाणी तयार केले जाते. जे शरीरातील घाण आणि विषारी घटक काढून टाकण्यास मदत करतात. बहुतेक लोकांना काकडी, लिंबू आणि पुदिन्याचे डिटॉक्स वॉटर पिणे आवडते. ते प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार डिटॉक्स वॉटर बनवता येते.

आजकाल लोक डिटॉक्स वॉटर बनवून पिऊ लागले आहेत. पण जर ते जास्त प्रमाणात सेवन केले किंवा शरीराच्या गरजेनुसार आणि योग्य पद्धतीने सेवन केले नाही तर ते तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते. डिटॉक्स वॉटर आरोग्याला कसे हानी पोहोचवू शकते आणि ते पिण्याची योग्य पद्धत कोणती आहे याबद्दल तज्ञांकडून जाणून घेऊया.

तज्ञ काय म्हणतात?

दिल्लीतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार इंटरनल मेडिसिन डॉ. राहुल खन्ना सांगतात की, डिटॉक्स वॉटर सहसा पाण्यात फळे, भाज्या किंवा हर्ब्स मिसळून बनवले जाते, ज्यामुळे पाण्याची चव देखील सुधारते. जरी ते हानिकारक नसले तरी, यांचे चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास आरोग्यास हानी पोहोचवू शकते. जास्त प्रमाणात डिटॉक्स वॉटर प्यायल्याने इलेक्ट्रोलाइट असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे किंवा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. त्याच वेळी, काही लोक त्यात भरपूर आंबट फळे मिक्स करतात, ज्यामुळे आम्लपित्त समस्या उद्भवू शकतात किंवा दातांच्या मुलामांना नुकसान पोहोचवू शकते.

डिटॉक्स वॉटर पिण्याची योग्य पद्धत

डॉक्टर सांगतात की डिटॉक्स वॉटर पिण्याचा योग्य मार्ग म्हणजे ताजी फळे किंवा हर्ब्सचे मिश्रण मिक्स करून ते बनवणे आणि ते 2ते 4 तासांच्या आत प्यावे, जेणेकरून त्यातील पोषक घटक सुरक्षित राहतील. दिवसातून 1-2 लिटर पाणी पिणे ठीक आहे, परंतु त्यापेक्षा जास्त पाणी पिल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे किडनीवर जास्त दबाव येऊ शकतो. अशावेळी तज्ञ सांगतात की डिटॉक्स वॉटर हे जादूचे पेय नाही, तर ते पाणी पिण्याचा एक निरोगी मार्ग आहे. संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत सेवन केल्यास ते फायदेशीर ठरू शकते. फळे, भाज्या आणि हर्ब्स रात्रभर किंवा काही तास पाण्यात भिजवून ठेवता येतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सेवन करता येतात. पण त्याआधी, तुमच्या तज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.