AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्भपात झाल्यानंतर ‘या’ गोष्टी टाळणं अत्यंत महत्त्वाचं, महिलांनी लक्षात ठेवा काही गोष्टी

गर्भपाक झाल्यानंतर महिलांना प्रचंड वेदना होतात आणि प्रचंड रक्तस्त्राव देखील होत असतो. अशा वेळेस महिलांनी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. शिवाय कोणत्या गोष्टी करु नये याबद्दल देखील माहिती असलं पाहिजे... तर जाणू घ्या तज्ज्ञ काय सांगतात.

गर्भपात झाल्यानंतर 'या' गोष्टी टाळणं अत्यंत महत्त्वाचं, महिलांनी लक्षात ठेवा काही गोष्टी
| Updated on: Oct 26, 2025 | 9:34 AM
Share

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं… यामध्ये अनेक महिलांना गर्भपाताचा देखील सामना करावा लागतो… अशात महिलांनी प्रकृती स्थिर नसते. म्हणून महिलांनी गर्भपातानंतर काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. गर्भधारणेच्या 20 आठवड्यांच्या आत गर्भ गर्भाशयातच मरण पावला तर आपण त्याला गर्भपात म्हणून ओळखतो. ही परिस्थिती कोणत्याही महिलेसाठी खूप भयावह असते. ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रत्येक महिला सर्व खबरदारी घेतं. शिवाय, ती डॉक्टरांच्या सल्ल्याचं पूर्णपणे पालन करते.

गर्भपातानंतर महिलेला जीवनशैलीत आणि आहारात आवश्यक बदल करणं आवश्यक आहे. हे टाळण्यासाठी प्रत्येक महिलेने काळजी घेणं आवश्यक आहे. पण, आपण असं काही प्रकरण पाहतो जिथे काही आजारामुळे किंवा शारीरिक समस्येमुळे काही महिलांना गर्भपाताला सामोरं जावं लागतं. गर्भपात एखाद्या महिलेला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप त्रास देऊ शकतो. तिला त्याचा सामना करणं खूप कठीण असू शकतं. पण, या काही गोष्टी लक्षात ठेवा. यामुळे तुमची पुनर्प्राप्ती जलद होईल आणि तुम्ही तुमच्या पुढील गर्भधारणेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहात याची खात्री होईल.

स्त्रीरोगतज्ज्ञांकडून सविस्तर माहिती घ्या.

जर एखाद्या महिलेचा अचानक गर्भपात झाला तर सर्वात आधी रक्तस्त्राव सुरू होतो. हे गर्भपाताचे पहिले लक्षण आहे. यावेळी महिलांनी डॉक्टरकडे जाऊन योग्य उपचार घ्यावेत. काही महिलांना गर्भपात झाल्यानंतर दीर्घकाळ रक्तस्त्राव होतो. या काळात टॅम्पन्स वापरू नयेत. टॅम्पन्सऐवजी नियमित पॅड वापरण्याचा प्रयत्न करा.

गर्भपात झाल्यानंतर, तुम्ही काही काळ लैंगिक संबंधांपासून दूर राहा. यामुळे संसर्गाचा धोका तर वाढतोच पण तुमच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. गर्भपात झाल्यानंतर महिला कमकुवत होतात. या काळा महिलांनी विश्रांती घ्यावी. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच पुन्हा लैंगिक संबंध ठेवणे चांगले.

गर्भपात झाल्यानंतर, महिलांनी कोणत्याही प्रकारची जड कसरत करू नये. गर्भवती महिलेचा अपघाती गर्भपात झाला तरी, हे लक्षात ठेवा की हा प्रवास सोपा नाही. गर्भपात झाल्यानंतर महिलेचं शरीर सहजासहजी बरं होत नाही. त्यासाठी निरोगी आहाराचं पालन करणं महत्वाचं आहे. याबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

(टीप: येथे दिलेली माहिती फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. कोणताही उपचार घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.)

Follow Us
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त.
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका.
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ.
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील.
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?.
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?.
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक...
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर.....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर......
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र.
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार..
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार...