AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्भपात झाल्यानंतर ‘या’ गोष्टी टाळणं अत्यंत महत्त्वाचं, महिलांनी लक्षात ठेवा काही गोष्टी

गर्भपाक झाल्यानंतर महिलांना प्रचंड वेदना होतात आणि प्रचंड रक्तस्त्राव देखील होत असतो. अशा वेळेस महिलांनी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. शिवाय कोणत्या गोष्टी करु नये याबद्दल देखील माहिती असलं पाहिजे... तर जाणू घ्या तज्ज्ञ काय सांगतात.

गर्भपात झाल्यानंतर 'या' गोष्टी टाळणं अत्यंत महत्त्वाचं, महिलांनी लक्षात ठेवा काही गोष्टी
| Updated on: Oct 26, 2025 | 9:34 AM
Share

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं… यामध्ये अनेक महिलांना गर्भपाताचा देखील सामना करावा लागतो… अशात महिलांनी प्रकृती स्थिर नसते. म्हणून महिलांनी गर्भपातानंतर काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. गर्भधारणेच्या 20 आठवड्यांच्या आत गर्भ गर्भाशयातच मरण पावला तर आपण त्याला गर्भपात म्हणून ओळखतो. ही परिस्थिती कोणत्याही महिलेसाठी खूप भयावह असते. ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रत्येक महिला सर्व खबरदारी घेतं. शिवाय, ती डॉक्टरांच्या सल्ल्याचं पूर्णपणे पालन करते.

गर्भपातानंतर महिलेला जीवनशैलीत आणि आहारात आवश्यक बदल करणं आवश्यक आहे. हे टाळण्यासाठी प्रत्येक महिलेने काळजी घेणं आवश्यक आहे. पण, आपण असं काही प्रकरण पाहतो जिथे काही आजारामुळे किंवा शारीरिक समस्येमुळे काही महिलांना गर्भपाताला सामोरं जावं लागतं. गर्भपात एखाद्या महिलेला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप त्रास देऊ शकतो. तिला त्याचा सामना करणं खूप कठीण असू शकतं. पण, या काही गोष्टी लक्षात ठेवा. यामुळे तुमची पुनर्प्राप्ती जलद होईल आणि तुम्ही तुमच्या पुढील गर्भधारणेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहात याची खात्री होईल.

स्त्रीरोगतज्ज्ञांकडून सविस्तर माहिती घ्या.

जर एखाद्या महिलेचा अचानक गर्भपात झाला तर सर्वात आधी रक्तस्त्राव सुरू होतो. हे गर्भपाताचे पहिले लक्षण आहे. यावेळी महिलांनी डॉक्टरकडे जाऊन योग्य उपचार घ्यावेत. काही महिलांना गर्भपात झाल्यानंतर दीर्घकाळ रक्तस्त्राव होतो. या काळात टॅम्पन्स वापरू नयेत. टॅम्पन्सऐवजी नियमित पॅड वापरण्याचा प्रयत्न करा.

गर्भपात झाल्यानंतर, तुम्ही काही काळ लैंगिक संबंधांपासून दूर राहा. यामुळे संसर्गाचा धोका तर वाढतोच पण तुमच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. गर्भपात झाल्यानंतर महिला कमकुवत होतात. या काळा महिलांनी विश्रांती घ्यावी. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच पुन्हा लैंगिक संबंध ठेवणे चांगले.

गर्भपात झाल्यानंतर, महिलांनी कोणत्याही प्रकारची जड कसरत करू नये. गर्भवती महिलेचा अपघाती गर्भपात झाला तरी, हे लक्षात ठेवा की हा प्रवास सोपा नाही. गर्भपात झाल्यानंतर महिलेचं शरीर सहजासहजी बरं होत नाही. त्यासाठी निरोगी आहाराचं पालन करणं महत्वाचं आहे. याबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

(टीप: येथे दिलेली माहिती फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. कोणताही उपचार घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.)

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार