AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅनडा भारताला देणार मोठं गिफ्ट, भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूला देशाबाहेर हाकलणार; काय घडणार?

26/11 Mumbai Attack : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यापूर्वी कॅनडा भारताला खूष करण्याचा प्रयत्न करत आहे. कॅनडाने भारताला एक गुड न्यूज दिली आहे.

कॅनडा भारताला देणार मोठं गिफ्ट, भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूला देशाबाहेर हाकलणार; काय घडणार?
tahawwur ranaImage Credit source: Google
| Updated on: Feb 24, 2026 | 3:19 PM
Share

गेल्या काही काळापासून जागतिक स्तरावर अनेक घडामोडी घडल्याचे पहायला मिळाले. अशातच आता कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यापूर्वी कॅनडा भारताला खूष करण्याचा प्रयत्न करत आहे. या अंतर्गत कॅनडा 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याचे नागरिकत्व रद्द करण्याची तयारी करत आहे. याबाबत राणाला कॅनडाच्या सरकारने माहिती दिली आहे. तहव्वुर राणा सध्या भारतात तुरुंगात आहे. तो मूळ पाकिस्तानी वंशाचा असून त्याला 2001 मध्ये कॅनेडाचे नागरिकत्व मिळाले होते. मात्र हे नागरिकत्व मिळवताना तो खोटं बोलवल्याचा आरोप त्याच्यावर आहे, त्यामुळे आता त्याचे नागरिकत्व रद्द होणार आहे.

तहव्वुरचे नागरिकत्व का रद्द होणार?

कॅनडाच्या इमिग्रेशन विभागाने दिलेल्या माहितीनुसार तहव्वुर राणा नागरिकत्वासाठी अर्ज करताना खोटे बोलला होती. 2000 साली त्याने नागरिकत्वासाठी अर्ज केला तेव्हा त्याने गेल्या चार वर्षांपासून ओटावा आणि टोरंटोमध्ये राहण्याचा दावा केला होता, मात्र हा दावा खोटा ठरला आहे. तसेच त्याने फक्त तहव्वुरने फक्त सहा दिवसांसाठी कॅनडाबाहेर असल्याचा दावा केला होता. मात्र हा दावाही खोटा ठरला आहे. इमिग्रेशन विभागाने सांगितले की, नागरिकत्व मिळवण्यापूर्वी तहव्वुरने आपला सर्व वेळ शिकागोमध्ये घालवला होता, तिथे त्याने संपत्ती देखील कमावली होती.

इमिग्रेशन विभागाने फसवणूक आणि बनावटगिरीचा संपूर्ण अहवाल तयार केला असून तो न्यायालयात सादर केला जाणार आहे. या पुराव्यांच्या आधारे इमिग्रेशन विभागाला नागरिकत्व रद्द करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर तहव्वुर राणाचे नागरिकत्व रद्द केले जाणार आहे.

तहव्वुर राणासाठी धक्का का आहे?

26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर तहव्वुर राणावर हा सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र त्यावेळी कॅनडाच्या सरकारने त्याची पाठराखण केली होती. कॅनडाने तहव्वुर राणाला पाठिंबा दिला होता, मात्र आता सरकारने भूमिका बदलली असून त्याचे नागरिकत्व रद्द करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान, तहव्वुर राणा सध्या भारतीय तुरुंगात कैद आहे. तो स्वतःसाठी कॉन्सुलर अॅक्सेसची विनंती करत आहे. तो कुटुंबाला भेटण्याची परवानगी मागत आहे. जर कॅनडाने त्याला पाठिंबा दिला असता तर भारतासाठी मोठा पेच निर्माण झाला असता, मात्र आता तसे होणार नाही. आता आगामी काळात तहव्वुर राणाबाबत भारत सरकार कठोर निर्णय घेऊ शकणार आहे. ही भारतासाठी आनंदाची बाब आहे.

पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोनं शोधण्यासाठी तौबा गर्दी! काय आहे प्रकार
पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोनं शोधण्यासाठी तौबा गर्दी! काय आहे प्रकार.
विरोधी पक्षनेता नसलेले पहिले अधिवेशन! आदित्य ठाकरे यांची टीका
विरोधी पक्षनेता नसलेले पहिले अधिवेशन! आदित्य ठाकरे यांची टीका.
पार्थ पवार, आठवले आणि शेवाळे राज्यसभेवर जाणार? पडद्यामागे काय ठरलं?
पार्थ पवार, आठवले आणि शेवाळे राज्यसभेवर जाणार? पडद्यामागे काय ठरलं?.
सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन
सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन.
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह.
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंचा एकाच लिफ्टमधून प्रवास!
मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंचा एकाच लिफ्टमधून प्रवास!.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने चर्चा करा! वडेट्टीवार यांची मागणी
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने चर्चा करा! वडेट्टीवार यांची मागणी.
शरद पवार यांना रुग्णालयातून उद्या डिस्चार्ज
शरद पवार यांना रुग्णालयातून उद्या डिस्चार्ज.
उत्तम मुख्यमंत्री झाले असते म्हणणारेच दादांना तुरुंगात टाकणार होते
उत्तम मुख्यमंत्री झाले असते म्हणणारेच दादांना तुरुंगात टाकणार होते.