AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

History : 19 वर्षे सुरु राहिलेला रक्तरंजित संघर्ष, 20 लाखांहून अधिक लोकांचे बळी, अखेर ‘या’ देशातून अमेरिका बाहेर पडला

व्हिएतनाम युद्धात अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये व्हिएतनामचे तब्बल 20 लाख सैनिक आणि सामान्य नागरिक बळी ठरले. या युद्धात अमेरिकेने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं

History : 19 वर्षे सुरु राहिलेला रक्तरंजित संघर्ष, 20 लाखांहून अधिक लोकांचे बळी, अखेर 'या' देशातून अमेरिका बाहेर पडला
| Updated on: Mar 29, 2021 | 6:01 PM
Share

हनोई (Hanoi) : दुसऱ्या जागतिक युद्धानंतर (Second World War) संपूर्ण जग दोन गटात विभागलं गेलं. एकीकडे अमेरिका (America) आपली भांडवलवादी विचारसरणी जगावर थोपवू पाहत होता. दुसरीकडे सोवियत संघ (Soviet Union) आपली कम्युनिस्ट विचारसरणी पसरवण्याचा प्रयत्न करत होता. अमेरिका आणि सोवियत संघाच्या या चढाओढीत अनेक देश उद्ध्वस्त झाले. यातील दोन मुख्य देश म्हणजे उत्तर व्हिएतनाम (North Vietnam) आणि दक्षिण व्हिएतनाम (South Vietnam). या युद्धात व्हिएतनामचे तब्बल 20 लाख सैनिक आणि सामान्य नागरिक बळी ठरले. या युद्धात अमेरिकेने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं (History of 29 March about Vietnam War America and Soviet Union).

या युद्धात व्हिएतनामचं मोठं नुकसान झालं, मात्र व्हिएतनामनेही चिवट संघर्ष केला. यात अमेरिकेलाही आपले 58 हजार सैनिक गमवावे लागले. या युद्धात उत्तर व्हिएतनामला सोवियत संघ, चीन आणि इतर कम्युनिस्ट देशांनी पाठिंबा दिला. दुसरीकडे दक्षिण व्हिएतनामला अमेरिका, दक्षिण कोरिया, फिलीपींस, ऑस्ट्रेलिया, थायलंड आणि इतर कम्युनिस्ट विरोधी भांडवलदार देशांनी पाठिंबा दिला. व्हिएतनाम युद्धात अमेरिकेने जोरदार शक्तीप्रदर्शन करत अनेक हल्ले केले. यात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. या युद्धाबाबत आजचा दिवस (29 मार्च) महत्त्वाचा आहे, कारण आजच्याच दिवशी अमेरिकेने आपलं सर्व सैन्य व्हिएतनाममधून माघारी बोलावलं आणि युद्ध संपलं.

युद्ध संपवण्यासाठी पॅरिसमध्ये शांतता करारावर स्वाक्षरी

अमेरिकेने 1954 मध्ये व्हिएतनाममध्ये युद्धाला सुरुवात केली. हे युद्ध 1973 पर्यंत म्हणजेच एकूण 19 वर्षे सुरु राहिलं. या काळात अमेरिकेत 3 राष्ट्राध्यक्ष बदलले. 29 मार्च 1973 रोजी शेवटचा अमेरिकन सैनिक व्हिएतनामच्या जमिनीवरुन माघारी परतला. शांतता कराराने युद्धातील अमेरिकेचा सहभाग संपला. या पॅरिस करारानुसार अमेरिकेच्या सैनिकांनी सन्मानाने व्हिएतनाम बाहेर जाण्याचं ठरलं. तसेच युद्धबंदी असलेल्या सैनिकांनाही सोडून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

पॅरिस करारातील मुख्य अटी

पॅरिस शांतता करारात युद्ध समाप्तीची घोषणा करण्यासोबतच इतरही मुख्य गोष्टींवर निर्णय झाला. यानुसार अमेरिकेचं सैन्या मागे घेणं, युद्ध बंदी सैनिकांना सोडणं आणि शांततापूर्ण मार्गाने उत्तर आणि दक्षिण व्हिएतनामचं एकिकरण करण्याचा निर्णय झाला. याशिवाय व्हिएतनाममध्ये नव्याने निवडणूक होऊन सरकार स्थापन होईपर्यंत दक्षिण व्हिएतनामचं सरकार कायम ठेवणं आणि दक्षिण भागातील उत्तर व्हिएतनाम सैनिकांनी पुढे न सरकणं याही अटी मान्य करण्यात आल्या.

हेही वाचा :

4 लाख मुलांचा मृत्यू होण्याची शक्यता, 12 लाख गरोदर महिलांवरही संकट, UN चा गंभीर इशारा

‘या’ देशात 5 लाख लोकांचा बळी, आता कुपोषणाचं संकट, भारताचा मदतीचा हात

चीन आणि पाकिस्तानशी एकाचवेळी युद्ध झाल्यास भारत काय करणार?

व्हिडीओ पाहा :

History of 29 March about Vietnam War America and Soviet Union

Follow Us
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक.
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!.
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?.