AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Air Indiaचे नाव 75 वर्षापूर्वी ठेवले गेले, पण यामागेही आहे इंटरेस्टिंग कारण! जाणून घ्या रंजक कहाणी

Air India Name Story : 75 वर्ष पूर्वी टाटा कंपनीमधील कर्मचाऱ्यांच्या दरम्यान एक ऑपिनियन पोलमध्ये चार नावे ठरविण्यात आली होती. त्यानंतर चार नावांपैकी एका नावाची निवड केली गेली. देशाच्या पहिल्या एअरलाइन कंपनीचे नाव एयर इंडिया असे ठेवले गेले.

Air Indiaचे नाव 75 वर्षापूर्वी ठेवले गेले, पण यामागेही आहे इंटरेस्टिंग कारण! जाणून घ्या रंजक कहाणी
एअर इंडिया, रतन टाटा (संपादित छायाचित्र)
| Updated on: Feb 06, 2022 | 4:10 PM
Share

Air India Name Story : 75 वर्ष पूर्वी टाटा (Tata) कंपनीमधील कर्मचाऱ्यांच्या दरम्यान एक ऑपिनियन पोलमध्ये चार नाव ठरविण्यात आले होते आणि त्यानंतर चार नावांपैकी एका नावाची निवड केली गेली. देशाच्या पहिल्या एअरलाइन (Airline) कंपनीचे नाव एयर इंडिया (Air India) असे ठेवले गेले. एअर इंडियाचे अधिकृतपणे अधिग्रहण केल्यानंतर टाटा ग्रुपने एयरलाइन्सशी निगडित असलेल्या इतिहासाबद्दल महत्त्वाची माहिती सर्वांना सांगितली. टाटा ग्रुपकडून गेल्या सात दशकांपासून ही कंपनी हातातून निसटली होती. गेल्या महिन्यात टाटा ग्रुपकडे एअरलाइन्स इंडिया परत आली आहे म्हणजेच अनेक वर्षांपासून हातातून निसटून गेलेली ही इंडिया कंपनी आता टाटा यांच्या नेतृत्वाखालील पुढील कार्य व वाटचाल करणार आहे. 1946मध्ये टाटा एयरलाइन्सचे टाटा सन्स (Tata Sons)मधील एक डिविजन द्वारे विस्तारीकरण करण्यात आले होते. अनेक ट्वीट्समध्ये टाटा ग्रुपच्या दोन फोटोंना अनेकदा शेअरसुद्धा केले आहे. यामध्ये वर्षे 1946मधील एक भाग सुद्धा समाविष्ट आहे. एयर इंडियाने हे ट्विट रिट्विटदेखील केले आहे.

आधी टाटा एयरलाइन्स होते नाव

बुलेटिननुसार जेव्हा टाटा एअरलाइन्स टाटा सन्स लिमिटेडचा एक विभाग म्हणून सुरुवातीला काम करत होती, तेव्हा कंपनीचे विस्तारीकरण करत असताना आणि नवीन एअरलाइन कंपनी बनवण्याची सुरुवात सुद्धा करणार होते. तेव्हा त्यांना या नवीन एअरलाइनसाठी नाव नव्याने शोधण्यास अडचण आली होती. अशावेळी नाव ठेवण्यासाठी वेगवेगळ्या नावांचा विचार केला जाऊ लागला. जसे की, इंडियन एयरलाइन्स, एयर इंडिया, पैन इंडियन एयरलाइन्स आणि ट्रान्स-इंडियन एयरलाइन्समधून एखादे नाव निवडायचे होते. बुलेटिनमध्ये असे सांगण्यात आले आहे की टाटा ग्रुपचे संघटन विभाग प्रमुख यांच्या मनामध्ये याबद्दलचा विचार आला होता अन् त्यांना असे वाटत होते, की या नावाचे ठराव बॉम्बे हाऊसमध्ये पॉप्युलर ऑपिनियनद्वारे घेतले जावे. यासाठी एखाद्या गेल अप किंवा सॅम्पल ऑपिनियन सर्वेचा विचार करून ऑपिनियन घेतले जावे, असेसुद्धा विचार त्यांच्या मनात आले होते.

एयर इंडिया नावाला मिळाले होते सर्वात जास्त मते

नाव ठरवण्यासाठी टाटा ग्रुपमधील कर्मचाऱ्यांमध्ये मत घेण्यासाठी वोटिंग पेपर वाटले गेले आणि त्यावेळी त्यांना पहिले आणि प्राथमिक स्वरूपानुसार एखादे नाव निवडण्यासाठी सांगण्यात आले. बुलेटनुसार पहिल्या वेळेतच एयर इंडियाला 64 वोट, इंडियन एयरलाइन्सला 51 वोट, ट्रान्स इंडियन एयर लाइन्सला 28 वोट आणि पैन-इंडियन एयरलाइन्सला एकंदरीत 19 वोट मिळाले होते. मग सर्वात कमी वोट मिळालेल्या नावाला हटवण्यात आले आणि शेवटच्या राऊंडमध्ये व मतमोजणीच्या वेळी इंडियन एअरलाइन्सला 58 वोट मिळाले. बुलेटिनमध्ये असे सांगितले गेले आहे, की म्हणूनच नवीन कंपनीचे नाव एअर इंडिया असे ठेवले गेले. पहिल्या ट्विटमध्ये जे लिहिण्यात आले होते, त्यात हे नाव कोणी ठेवले? एअर इंडियाच्या नावासोबतच बॅकग्राऊंडमध्ये एका जुन्या एअर इंडिया एअर क्राफ्टचे फोटो सुद्धा देण्यात आले होते.

स्वातंत्र्योत्तर काळात पहिला राष्ट्रीय दुखवटा कधी जाहीर झाला… काय आहेत नियम….

कोल्डड्रिंक, सोडा बॉटलच्या खालील भाग सपाट का नसतो? जाणून घ्या इंटरेस्टिंग कारण!

अंतराळातील दोन ग्रह जुळे असूनही रंग मात्र वेगवेगळा? शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.