AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिकिट नसलेली भारतातील एकमेव रेल्वे, TT नाही, फ्री प्रवास करा

या रेल्वे गाडीत तुम्हाला मोफत प्रवास करता येतो, अहो यात TT देखील नाही. गेल्या 75 वर्षांपासून ही रेल्वे गाडी प्रवाशांना मोफत सुविधा देत आहे. ही रेल्वे पंजाबमधील नांगल ते हिमाचल प्रदेशातील भाखडादरम्यान 15 किलोमीटरचे अंतर पार करते. ही नेमकी कोणती रेल्वे गाडी आहे, जाणून घ्या.

तिकिट नसलेली भारतातील एकमेव रेल्वे, TT नाही, फ्री प्रवास करा
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Nov 28, 2024 | 3:55 PM
Share

तिकिट नसलेली भारतातील एकमेव ट्रेन कोणती आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला TT देखील मिळणार नाही. गेल्या 75 वर्षांपासून ही रेल्वे गाडी प्रवाशांना मोफत सुविधा देत आहे. तुम्ही म्हणाल आजच्या जमान्यात काय मोफत मिळतं. पण, या रेल्वेत तुम्ही मोफत प्रवास करू शकतात, जाणून घ्या.

भारतात जगातील सर्वात मोठे रेल्वे जाळे आहे. रोज 13 हजारांहून अधिक गाड्या धावतात. या रोज 2 कोटी 31 लाख प्रवाशांना त्यांच्या पोहोचण्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचवतात. भारतातील रेल्वेची एकूण लांबी 1,15,000 कि.मी. कमी खर्चात प्रवाशांना सेवा देणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अशी भारतीय रेल्वेची ओळख आहे.

75 वर्षांपासून प्रवाशांना मोफत सेवा

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अशी एक ट्रेन आहे जी गेल्या 75 वर्षांपासून प्रवाशांना मोफत सेवा देत आहे. या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट काढण्याची गरज नाही. ज्या प्रवाशांना या ट्रेनमध्ये प्रवास करायचा आहे, ते विनामूल्य करू शकतात. नाही, ही टायपिंग मिस्टेक नाही, तुम्ही बरोबर वाचत आहात. ही गाडी सर्व प्रवाशांना मोफत प्रवासाची सुविधा देते.

भाक्रा-नांगल ट्रेन

ही रेल्वे सेवा भाक्रा-नांगल या नावाने ओळखली जाते. गेली 75 वर्षे सातत्याने जनतेची सेवा करत आहे. ही गाडी पंजाबमधील नांगल ते हिमाचल प्रदेशातील भाखडादरम्यान केवळ 13 किलोमीटरचे अंतर पार करते. संपूर्ण प्रवासात ती केवळ पाच स्थानकांवर थांबते. ती सतलज नदी आणि शिवालिक टेकड्यांवरून जाते, जिथे वाटेत सुंदर नजारे दिसतात.

भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामासाठी मजूर आणि साहित्य वाहून नेण्यासाठी या गाडीचा वापर करण्यात आला होता. या गाडीतील जागा सामान्य असल्या तरी त्या त्याच्या इतिहासाचा भाग आहेत.

भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामादरम्यान मोठी यंत्रे, लोखंड, दगड यासह सर्व माल वाहून नेण्यासाठी हा रेल्वे मार्ग बांधण्यात आला होता. धरण बांधणीच्या वेळी कामाच्या सुलभतेसाठी हा रेल्वेमार्ग बांधण्यात आला होता. धरण बांधल्यानंतरही येथील गावांना जोडण्यासाठी ही रेल्वेसेवा सुरू ठेवण्यात आली होती.

विशेष म्हणजे भाक्रा-नांगल धरणाचे बांधकाम त्यावेळी ही गाडी मशिन, सामान फुकट घेऊन जात असे. पुढे प्रवाशांना मोफत सेवाही देण्यास सुरुवात केली. 1948 पासून ही गाडी सातत्याने धावत आहे. 1953 मध्ये अमेरिकेतून आयात केलेले डिझेल इंजिन बसविल्यानंतर त्यात मोठी सुधारणा झाली.

तुम्हाला तिकीट का मिळत नाही?

या गाडीचे तिकीट न मिळण्यामागे अनेक कारणे आहेत. भाखड़ा ब्यास मॅनेजमेंट बोर्ड (बीबीएमबी) द्वारे त्याचे संचालन आणि व्यवस्थापन केले जाते. एकदा बीबीएमबीने ऑपरेशनल कॉस्टमुळे त्याचे भाडे आकारण्याचा विचार केला. कारण ट्रेन धावताना दर तासाला सुमारे 18 ते 20 गॅलन इंधनाचा वापर होतो. पण गाडीचा वारसा लक्षात घेऊन ती मोफत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

निर्मिती कराचीमध्ये

ही केवळ वाहतूक आहे हे साधन नाही, तर इतिहास आणि परंपरेचा जीवंत भाग आहे. तिकिटांअभावी या गाडीत टीटी नाही. या ट्रेनच्या डब्यांची खासियत म्हणजे त्यांची निर्मिती कराचीमध्ये करण्यात आली होती. याशिवाय या खुर्च्याही ब्रिटिश काळातील लाकडापासून बनवल्या आहेत.

60 वर्षे जुने इंजिन

सुरुवातीच्या काळात ही गाडी वाफेच्या इंजिनाने धावते होते. पण 1953 मध्ये अमेरिकेतून आणलेल्या तीन आधुनिक इंजिनांनी त्यांची जागा घेतली. तेव्हापासून भारतीय रेल्वेने इंजिनच्या बाबतीत बरीच प्रगती केली आहे. पण या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे आजही ती 60 वर्षे जुनी इंजिने वाहून नेतात. बॉलिवूडच्या एका चित्रपटातही ही ट्रेन दाखवण्यात आली आहे. त्याची झलक सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या ‘चलता पुर्जा ‘ या चित्रपटात पाहायला मिळाली.

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्रवाशांना भारतातील सर्वात उंच धरणांपैकी एक, भाक्रा-नांगल धरण आणि सुंदर शिवालिक टेकड्या पाहता येतात.

रोज सकाळी 7.05 वाजता, नांगल रेल्वे स्थानकातून सुटणारी ही गाडी रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी भाखड़ा येथे पोहोचते. परतीच्या प्रवासात ही गाडी नांगल येथून दुपारी 3 वाजून 5 मिनिटांनी सुटते आणि 4 वाजून 20 मिनिटांनी भाखडा रेल्वे स्थानकावर प्रवाशांना उतरवते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.