AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रेनमध्ये जनरल बोगी केवळ पुढे आणि मागे का असते ? मध्यभागी का नाही ? रेल्वेने दिले उत्तर

एक्सप्रेस आणि सुपरफास्ट ट्रेनमध्ये सामान्य श्रेणीचे डबे ट्रेनच्या पाठी किंवा पुढे जोडलेले असतात. ट्रेनच्या मधल्या भागात जनरल डबे का लावले जात नाहीत. या मागच्या कारणाचा आपण धांडोळा घेऊयात ..

ट्रेनमध्ये जनरल बोगी केवळ पुढे आणि मागे का असते ? मध्यभागी का नाही ?  रेल्वेने दिले उत्तर
| Updated on: Feb 11, 2025 | 9:11 PM
Share

आपण सर्वांनी कधी ना कधी रेल्वेने प्रवास केलेला आहे. कधी आपल्या गावाला जाण्यासाठी तर कधी नोकरीसाठी वा अन्य कारणांसाठी रेल्वेचा प्रवास करावाच लागत असतो. रेल्वेच्या गाड्यामध्ये नेहमीच विविध दर्जाचे डबे जोडलेले असतात. जनरल, स्लीपर आणि एसी कोच जोडलेले असतात. परंतू तुम्ही कधी याचा विचार केला आहे का की जनरल डबे नेहमी ट्रेनच्या मागे किंवा पुढे जोडलेले का असतात ?

ट्रेनच्या मागे आणि पुढेच का नेहमी जनरल डबे जोडलेले असतात याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? एक्सप्रेस आणि सुपरफास्ट ट्रेनमध्ये अनारक्षित / सामान्य श्रेणीचे डबे नेहमीच डब्याच्या पाठी किंवा पुढे जोडलेले असतात. ट्रेनच्या मधल्या भागात जनरल डबे का लावले जात नाहीत. या मागच्या कारणाचा आपण धांडोळा घेऊयात …

डबे किंवा बोगी यांच्या या रचनेमागे अनेक कारणे सांगितली जातात. एका तरुणाने ट्वीटरवर ( आताचे एक्स )  या संदर्भात नाराजी व्यक्त करीत हाच प्रश्न विचारला होता. २४ डब्यांच्या ट्रेनमध्ये जनरलचे दोन डबे का असतात. सर्वात महत्वाचे म्हणजे हे जनरल डबे ट्रेनच्या मागच्या आणि पुढच्या बाजूला का असतात ? या मागे ट्रेनचा अपघात झाला तर जनरल डब्यातून प्रवास करणारे गरीब आधी मरावे हा हेतू आहे का ? असा संतप्त सवाल या प्रवाशाने करीत रेल्वेला देखील टॅग केले.

या प्रश्नाला रेल्वेच्या अधिकारी संजय कुमार यांनी उत्तर दिले आहे. आपण चौकशी करणे योग्य आहे. परंतू त्यामागचा राग चांगला नाही. हे रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी केले जाते. जनरल कोचमध्ये जास्त गर्दी असते. त्यामुळे जर जनरल डबे ट्रेनच्या मध्यभागी लावले असते तर मध्यभागी फलाटावर प्रवासी गर्दी करतील त्यामुळे इतर वर्गाच्या प्रवाशांना दोन्ही दिशांना जाता येणार नाही.

आपात्कालीन स्थिती मदतीसाठी

जनरल डब्याने पुढे आणि मागे जोडण्याच्या मागे मुख्य कारण म्हणजे प्लॅटफॉर्मवरील गर्दीपासून वाचणे हा आहे. जनरल डबे दोन्ही दिशांना लावले तर गर्दी विभागली जाईल, काही जण पुढे जातील तर काही जण मागे जातील. हे रेल्वे अधिकाऱ्यांना आपात्कालिन स्थिती आणि दुर्घटनेच्या वेळी मदत पोहचविण्यासाठी आणि खराब स्थितीत मदत करण्यासाठी देखील सोयीचे आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.