AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्व दहशतवादी मदरशांमध्येच तयार होतात, सरकारने बंदी घालावी; भाजपच्या मंत्र्याची मागणी

राष्ट्रवाद आणि समाजाच्या मुख्य प्रवाहाशी स्वत:ला जोडू न शकणाऱ्या मदरशांचे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात विलिनीकरण करावे. | madrasas

सर्व दहशतवादी मदरशांमध्येच तयार होतात, सरकारने बंदी घालावी; भाजपच्या मंत्र्याची मागणी
| Updated on: Oct 21, 2020 | 9:33 AM
Share

भोपाळ: देशातील मदरशांमध्ये लहान मुलांमध्ये कट्टरतावाद आणि द्वेषभाव रुजवला जातो. याच मदरशांमध्येच दहशतवादी तयार होतात, असे वक्तव्य भाजप नेत्या उषा ठाकूर यांनी केले आहे. मदरशांमध्ये राष्ट्रवादाला सुसंगत असे शिक्षण दिले जात नाही. त्यामुळे सरकारने या मदरशांमधील प्रचलित शिक्षण पद्धती मोडून तेथील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे, अशी मागणी उषा ठाकूर यांनी केली. (All terrorists are raised in madrasas says BJP Minister )

सध्या पोटनिवडणुकांच्या निमित्ताने मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये मंत्री असलेल्या उषा ठाकूर या मंगळवारी इंदौर येथील पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. यावेळी उषा ठाकूर यांनी आसामच्या धर्तीवर देशातील सर्व मदरसे बंद करण्याची मागणी केली. संविधानाची स्वत:ची अशी वेगळी व्याख्या करणे योग्य नाही. विद्यार्थी हे विद्यार्थी असतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची सामूहिक शिक्षण होणे गरजेचे असल्याचे उषा ठाकूर यांनी सांगितले.

मदरशांमधील धर्माधारित शिक्षण लहान मुलांमध्ये कट्टरता आणि द्वेषभाव रुजवते. मदरशांमध्ये कोणती संस्कृती शिकवली जाते? आतापर्यंतची परिस्थिती पाहिल्यास सर्व कट्टरतावाद आणि दहशतवादी मदरशांमध्ये तयार झाल्याचे दिसून येईल. याच मदरशांमुळे जम्मू-काश्मीर दहशतवादाचा कारखाना झाला होता. त्यामुळे राष्ट्रवाद आणि समाजाच्या मुख्य प्रवाहाशी स्वत:ला जोडू न शकणाऱ्या मदरशांचे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात विलिनीकरण करावे. जेणेकरून संपूर्ण समाजाचा विकास होईल, असे मत उषा ठाकूर यांनी मांडले. आसाम सरकारने मदरसे बंद करून दाखवले. त्यामुळे सरकारने देशभरात राष्ट्रहिताच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट बंदच केली पाहिजे, असेही उषा ठाकूर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

सत्तेत असताना मदरसे बंद करावेसे वाटले नाहीत का; इम्तियाज जलीलांचा भाजपला सवाल

Atul Bhatkalkar | राज्यातील मदरसे बंद करुन दाखवा, अतुल भातखळकरांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, तर मग राज्यातील सर्व मदरसे बंद करा; भाजपचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

(All terrorists are raised in madrasas says BJP Minister )

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.