AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन शेतकऱ्यांसाठी मैदानात, जळगावात आंदोलन

शेतकऱ्यांशी निगडित विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन शेतकऱ्यांसाठी मैदानात, जळगावात आंदोलन
गिरीश महाजन, भाजप नेते.
| Updated on: Jun 23, 2020 | 4:51 PM
Share

जळगाव : शेतकऱ्यांशी निगडित विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी (BJP Protest In Jalgaon ) मंगळवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी उदासीन असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला (BJP Protest In Jalgaon ).

शेतकऱ्यांचे प्रश्न त्वरित सोडवले नाहीत, तर भाजपकडून यापुढे तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.

राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे पीककर्ज त्वरित मिळावे, कापूस, मका तसेच हरभऱ्याची हमीभावात खरेदी झालीच पाहिजे, कृषी कर्जमाफीची अंमलबजावणी तातडीने करावी, अशा अनेक मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. माजीमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व केले (BJP Protest In Jalgaon).

आंदोलनापूर्वी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चा तहसील कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर माजीमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांसमोर भाजपची भूमिका मांडली. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे राज्याचा कारभार सांभाळण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे भांडवल करुन सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारला आता शेतकऱ्यांचा विसर पडला आहे.

सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. यावर्षी पावसाळा सुरु झाला आहे. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांचा कापूस, मका तसेच हरभऱ्याची हमीभावात खरेदी झालेली नाही. शेतकऱ्यांना खरिपचे पीककर्ज मिळालेले नाही. कर्जमाफी योजनेची अजूनही प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली नाही. शेतकऱ्यांशी निगडित प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे, असा आरोप यावेळी सरकारवर करण्यात आला (BJP Protest In Jalgaon).

संबंधित बातम्या :

सव्वाशे कोटी नागरिकांनी चीनची एकही वस्तू वापरु नये, चीन जागेवरच येईल : अजित पवार

सुजय विखेंना पक्षात का घेतलं? मेधाताईंना विधानपरिषद का नाकारली?, देवेंद्र फडणवीसांची उत्तरं

हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबाबतचा इंटरेस्ट वाढला, त्यांच्याशी दोन मुद्द्यावर पटू शकतं : देवेंद्र फडणवीस

Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.