AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut | हिमाचल प्रदेश सरकारकडून कंगनाला सुरक्षा, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची माहिती

कंगनाच्या वडिलांनी सरकारकडे विनंती केली होती, त्यामुळे आम्ही कंगनाला सुरक्षा दिली, असंही जयराम ठाकूर यांनी स्पष्ट केलं

Kangana Ranaut | हिमाचल प्रदेश सरकारकडून कंगनाला सुरक्षा, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची माहिती
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Edited By: sagar joshi | Updated on: Aug 10, 2022 | 3:57 PM
Share

शिमला : हिमाचल प्रदेश सरकारने अभिनेत्री कंगना रनौतला सुरक्षा दिली आहे (Himachal Pradesh Government Provide Protection To Kangana Ranaut). याबाबत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी स्वत: माहिती दिली. कंगनाच्या वडिलांनी सरकारकडे विनंती केली होती, त्यामुळे आम्ही कंगनाला सुरक्षा दिली, असंही जयराम ठाकूर यांनी स्पष्ट केलं (Himachal Pradesh Government Provide Protection To Kangana Ranaut).

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर शिवेसना खासदार संजय राऊत यांनी कंगना रनौतला महाराष्ट्रात परत न येण्यास ठणकावलं होतं. त्यानंतर कंगनाने केंद्र आणि हिमाचल प्रदेश सरकारकडे सुरक्षेची मागणी केली होती.

कंगनाच्या घरच्यांनी हिमाचल प्रदेश सरकारकडे कंगनाला सुरक्षा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कंगनाला पूर्णपणे सुरक्षा देण्याचं आश्वासन दिलं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, “कंगनाच्या वडिलांसोबत त्यांनी फोनवरुन संवाद साधला होता. हिमाचल सरकार कंगनाला पूर्ण सुरक्षा देईल, त्यासाठी प्रदेशच्या पोलिस महासंचालक तसे आदेश देण्यात आले आहेत. 9 सप्टेंबरला कंगना मुंबईला येणार आहे आणि हिमाचलच्या मुलीला सुरक्षा प्रदान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत” (Himachal Pradesh Government Provide Protection To Kangana Ranaut).

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच कंगना रनौतने सुरुवातीपासून अनेक प्रश्न उपस्थित केले. तिने बॉलिवूड माफ‍िया, नेपोट‍िज्म आणि आता ड्रग्जच्या मुद्या उचलला. या दरम्यान, कंगनाने मुंबई पोलिसांवरही प्रश्न चिन्ह उपस्थित केले. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण आलं.

कंगनाला मुंबई पोलिसांवर विश्वास नसेल तर तिने महाराष्ट्रात येऊ नये, असं संजय राऊतांनी म्हटलं. तर अनेक नेत्यांनी कंगनावर टीका केली. इतकंच नाही तर कंगनाने महाराष्ट्राची तुलना थेट पाक व्याप्त काश्मीरशी केली. त्यामुळे संजय राऊतांसह अनेक राजकीय नेते कंगनावर बरसले. त्यानंतर आता कंगना हिमाचल प्रदेश पोलिसांच्या सुरक्षिततेत मुंबईत येण्याची शक्यता आहे.

Himachal Pradesh Government Provide Protection To Kangana Ranaut

संबंधित बातम्या :

कंगनाने सलमान खानला पटवण्याचा खूप प्रयत्न केला, तेव्हा तो म्हणाला होता… : राखी सावंत

महिला आयोगाच्या आडून भाजप माझ्या अटकेचा खेळ रचतंय : आमदार प्रताप सरनाईक

Kangana Ranaut | मुंबईनं मला यशोदा आईसारखं स्वीकारलं, मुंबई माझी कर्मभूमी, कंगनाला उपरती

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...