AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता जम्मू-काश्मीरमध्येही जमीन खरेदी करता येणार!, पंतप्रधान मोदी सरकारचा मोठा निर्णय

जम्मू-काश्मीमधील कलम 370 हटवल्यानंतर मोदी सरकारनं अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अन्य राज्यातील नागरिक आता जमीन खरेदी करु शकणार आहेत. ही जमीन उद्योग-व्यवसायासाठी खरेदी करता येणार आहे. मात्र, अन्य राज्यातील लोकांना शेतजमीन खरेदी करता येणार नाही.

आता जम्मू-काश्मीरमध्येही जमीन खरेदी करता येणार!, पंतप्रधान मोदी सरकारचा मोठा निर्णय
| Updated on: Oct 27, 2020 | 3:45 PM
Share

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान मोदी सरकारनं अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आता राज्याबाहेरील व्यक्तीही जमीन खरेदी करु शकणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून तर नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. असं असलं तरी जम्मू-काश्मीरमधील शेतजमीन मात्र कुणीही विकत घेऊ शकणार नाही. केंद्रीय गृह मंत्रालयाने जम्मू-काश्मीर पुनर्गठन अधिनियम अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. या अधिनियमानुसार आता जम्मू-काश्मीरमध्ये अन्य राज्यातील नागरिकांना कारखाना, घर किंवा दुकानासाठी जमीन खरेदी करता येणार आहे. (Now in Jammu-Kashmir land can be purchased by peoples of other state)

जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरचे उद्योग, व्यवसाय यावेत, तिथे रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देश्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितलं आहे. उद्योग, व्यवसायांसाठी जमीन घेता येणार असली तरी शेतजमीन मात्र जम्मू-काश्मीरमधील नागरिकांनाच घेता येणार आहे. मोदी सरकारनं हा निर्णय घेण्यापूर्वी अन्य राज्यातील नागरिकाला जम्मू-काश्मीरमध्ये जमीन विकत घेता येत नव्हती. मात्र, आता अन्य राज्यातील नागरिकही जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करुन तिथे आपल्या उद्योग-व्यवसाय सुरु करु शकणार आहेत. (Now in Jammu-Kashmir land can be purchased by peoples of other state)

जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारचे मोठे निर्णय

पंतप्रधान मोदी यांनी धाडसी निर्णय घेत मागील वर्षी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवलं आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर आता केंद्र सरकारनं जमीन खरेदीबाबत हा मोठा निर्णय घेतला आहे.

मेहबुबा मुफ्तींच्या वक्तव्यानंतर वादंग

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी संवैधानिक बदल वापस घेतले जात नाहीत. तोपर्यंत भारतीय राष्ट्रध्वज उचलण्यात कुठलही स्वारस्य नाही असं वक्तव्य शुक्रवारी केलं होतं. तसेच निवडणूक लढण्यातही रस नसल्याचं त्या म्हणाल्या होत्या. तसेच त्यांनी जम्मू काश्मीरचा जुना ध्वज परत देण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याविरोधात जम्मू काश्मीरमध्ये त्यांना चांगलाच विरोध होताना दिसतोय.

संबंधित बातम्या:

‘देशभक्तीच्या भावनेचा अनादर मान्य नाही’, मेहबुबा मुफ्तींवर नाराज PDP नेत्यांचा राजीनामा

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर जैशचा म्होरक्या मसूद अजहरला आानंदाच्या उकळ्या, ऑडिओ टेप जारी

Now in Jammu-Kashmir land can be purchased by peoples of other state

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.