AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कांचन नायक कालवश

1989 मध्ये स्मिता तळवलकर यांची निर्मिती असलेल्या 'कळत नकळत' या चित्रपटातून कांचन नायक यांनी विवाहबाह्य संबंधासारखा विषय हाताळण्याचे धाडस दाखवले होते. (Director Kanchan Nayak Passed Away)

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कांचन नायक कालवश
| Updated on: Jun 15, 2020 | 1:12 PM
Share

पुणे : ‘कळत नकळत’ सारख्या चित्रपटातून ऐशीच्या दशकात धाडसी विषय मोठ्या पडद्यावर मांडणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कांचन नायक यांचे निधन झाले. पुण्यात वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Director Kanchan Nayak Passed Away)

1989 मध्ये स्मिता तळवलकर यांची निर्मिती असलेल्या ‘कळत नकळत’ या चित्रपटातून कांचन नायक यांनी विवाहबाह्य संबंधासारखा विषय हाताळण्याचे धाडस दाखवले होते. कौटुंबिक ताणतणावाची भावविभोर उकल असलेल्या या सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यातही आले होते. या चित्रपटात विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अशोक सराफ, अश्विनी भावे यांच्या मुख्य भूमिका होत्या. ‘हे एक रेशमी घरटे’, ‘नाकावरच्या रागाला औषध काय’ यासारख्या गाण्यांसह आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

गेली साडे चार दशकं कांचन नायक मनोरंजन विश्वात कार्यरत होते. जब्बार पटेल, राजदत्त, प्रभाकर नायक, दिनकर डी पाटील यांच्यासारख्या दिग्गजांसोबतही त्यांनी काम केलं होतं. अनेक चित्रपट, माहितीपट आणि मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. झी मराठीवर त्यांनी दिग्दर्शित केलेली ‘बंधन’ मालिकाही गाजली होती.

कांचन नायक यांच्या दोन चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. कळत नकळत आणि ‘विश्वनाथ एक शिंपी’ या चित्रपटासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. ‘राजू’ या सांगीतिक सिनेमातून, तर ‘दणक्यावर दणके’ या विनोदी सिनेमातून त्यांनी वेगळा बाजही दाखवला होता.

अभिनेते सुबोध भावे यांनीही ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे. संवेदनशील दिग्दर्शक आणि माणूस हरपल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

(Director Kanchan Nayak Passed Away)

हेही वाचा : Sushant Singh Rajput | मैत्रिणीसोबत तणावाचे संबंध, सुशांतसिंह राजपूतच्या नोकराचा दावा

(Director Kanchan Nayak Passed Away)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.