AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँक बुडाल्यानंतर तुमचे किती पैसे सुरक्षित असतील? जाणून घ्या…

मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आणि लक्ष्मी विलास बँकेवर आरबीआयकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

| Edited By: | Updated on: Nov 18, 2020 | 3:47 PM
Share
महाराष्ट्रातील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (Mantha Urban Cooperative Bank) आणि लक्ष्मी विलास बँकेवर (Lakshmi Vilas Bank) आरबीआयकडून (RBI) निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. जर बँक बुडाली तर त्यांच्या खात्यात जमा असलेल्या पैशांचं काय होईल? असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. याबद्दल आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहोत.

महाराष्ट्रातील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (Mantha Urban Cooperative Bank) आणि लक्ष्मी विलास बँकेवर (Lakshmi Vilas Bank) आरबीआयकडून (RBI) निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. जर बँक बुडाली तर त्यांच्या खात्यात जमा असलेल्या पैशांचं काय होईल? असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. याबद्दल आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहोत.

1 / 9
कसे मिळणार पैसे परत? - बँकेत जमा असलेले पैसे सुरक्षित असण्याची एक मर्यादा आहे. त्या रकमेपेक्षा जास्त ठेवींवर कोणतीही शाश्वती नसते. म्हणजे ग्राहकांची संपूर्ण ठेव रक्कम बँकेत सुरक्षित असेलच असं नाही.

कसे मिळणार पैसे परत? - बँकेत जमा असलेले पैसे सुरक्षित असण्याची एक मर्यादा आहे. त्या रकमेपेक्षा जास्त ठेवींवर कोणतीही शाश्वती नसते. म्हणजे ग्राहकांची संपूर्ण ठेव रक्कम बँकेत सुरक्षित असेलच असं नाही.

2 / 9
जर बँक बुडाली तर 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित असतात. त्या रकमेला विमा संरक्षण असतं.

जर बँक बुडाली तर 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित असतात. त्या रकमेला विमा संरक्षण असतं.

3 / 9
म्हणजेच तुम्हाला गॅरंटीसह 5 लाख रुपयांपर्यंतची ठेव मिळेल आणि तीच रक्कम विमा आणि क्रेडिट गॅरंटी (डीआयसीजीसी) मध्ये तुम्हाला दिली जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा बँका प्रीमियम भरतात तेव्हाच हा विमा उपलब्ध असतो.

म्हणजेच तुम्हाला गॅरंटीसह 5 लाख रुपयांपर्यंतची ठेव मिळेल आणि तीच रक्कम विमा आणि क्रेडिट गॅरंटी (डीआयसीजीसी) मध्ये तुम्हाला दिली जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा बँका प्रीमियम भरतात तेव्हाच हा विमा उपलब्ध असतो.

4 / 9
जवळजवळ प्रत्येक खासगी आणि सार्वजनिक बँक ही प्रीमियम भरत असते. परंतु यानंतरही तुमचे पैसे सुरक्षित असतील याची शाश्वती देता येत नाही.

जवळजवळ प्रत्येक खासगी आणि सार्वजनिक बँक ही प्रीमियम भरत असते. परंतु यानंतरही तुमचे पैसे सुरक्षित असतील याची शाश्वती देता येत नाही.

5 / 9
या अंतर्गत सर्व प्रकारच्या बँका येतात ज्यामधून ग्राहकांना बचत, फिक्स्ड आणि रिकरिंग डिपॉजिटवर हमी दिली जाते.

या अंतर्गत सर्व प्रकारच्या बँका येतात ज्यामधून ग्राहकांना बचत, फिक्स्ड आणि रिकरिंग डिपॉजिटवर हमी दिली जाते.

6 / 9
यासह, ग्राहकांना त्यांच्या ठेवींवरील मुद्दल आणि व्याज रक्कम देखील मिळते. जर तुमची रक्कम 5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला तुमची संपूर्ण रक्कम परत मिळेल.

यासह, ग्राहकांना त्यांच्या ठेवींवरील मुद्दल आणि व्याज रक्कम देखील मिळते. जर तुमची रक्कम 5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला तुमची संपूर्ण रक्कम परत मिळेल.

7 / 9
जर एका बँकेत तुमची एकापेक्षा जास्त खाती असतील तर बँक बुडल्यानंतरसुद्धा तुम्हाला फक्त 5 लाख रुपये मिळण्याची हमी आहे.

जर एका बँकेत तुमची एकापेक्षा जास्त खाती असतील तर बँक बुडल्यानंतरसुद्धा तुम्हाला फक्त 5 लाख रुपये मिळण्याची हमी आहे.

8 / 9
डीआयसीजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही रक्कम तुम्हाला कशी परत मिळेल आणि यासाठी किती कालावधी जाईल याबद्दल काहीही सांगता येणार नाही.

डीआयसीजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही रक्कम तुम्हाला कशी परत मिळेल आणि यासाठी किती कालावधी जाईल याबद्दल काहीही सांगता येणार नाही.

9 / 9
Follow Us
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....