AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात कोरोनाचं थैमान, पंतप्रधान मोदी ‘मन की बात’मधून नागरिकांशी संवाद साधणार

देशभरात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत (Man Ki Baat of PM Narendra Modi amid Corona).

भारतात कोरोनाचं थैमान, पंतप्रधान मोदी 'मन की बात'मधून नागरिकांशी संवाद साधणार
| Updated on: Mar 29, 2020 | 9:50 AM
Share

नवी दिल्ली : देशभरात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत (Man Ki Baat of PM Narendra Modi amid Corona). कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी देशभरात सुरु घोषित केलेल्या लॉकडाऊन आणि शेतकऱ्यांच्या अडचणी यावर ते काही उपाययोजनांची घोषणा करणार का हेही या निमित्ताने स्पष्ट होणार आहे.

ऑल इंडिया रेडिओने पंतप्रधान मोदींच्या मन की बात या कार्यक्रमाची माहिती दिली आहे. ते आज सकाळी 11 वाजता या कार्यक्रमात बोलतील. मन की बात कार्यक्रम प्रत्येक महिन्याच शेवटच्या रविवारी होतो. याआधी पंतप्रधान मोदींनी कोरोना व्हायरसविरोधात लढण्याचं आवाहनही रेडिओवरुनच केलं होतं. यावेळी त्यांनी सकारात्मकतेला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचंही सांगितलं होतं.

पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना कोरोना विषाणू नियंत्रणासाठी सहकार्य करण्याचंही आवाहन केलं आहे. त्यांनी ट्विट करत देशवासीयांना पंतप्रधान सहायता निधीमध्ये योगदान देण्याचंही आवाहन केलं. या निधीचा उपयोग यापुढीही अशाप्रकारच्या मोठ्या संकटाच्या काळात केला जाईल, असं ते म्हणाले.

देशात कोरोना संसर्गाने हजाराचा टप्पा गाठला आहे. सरकारने कोरोना नियंत्रणासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे शेती आणि शेतकऱ्यांवरही दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे देशातून शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची मागणीही होत आहे.

Follow Us
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक.