AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डान्सबारच्यावेळी चार वेळा अध्यादेश काढले, मग मराठा आरक्षणाच्या बाबतीत का नाही? मराठा क्रांती मोर्चाचा सवाल

महाविकासआघाडी सरकार आमच्या बाबतीत दुजाभाव करतं आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी केला.

डान्सबारच्यावेळी चार वेळा अध्यादेश काढले, मग मराठा आरक्षणाच्या बाबतीत का नाही? मराठा क्रांती मोर्चाचा सवाल
| Edited By: | Updated on: Sep 14, 2020 | 5:47 PM
Share

पुणे : मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर नुकतंच मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद पार पडली. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवणं ही आमची पहिली मागणी आहे. महाविकासआघाडी सरकार आमच्या बाबतीत दुजाभाव करतं आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी केला. (Maratha Kranti Morcha Press Conference on Maratha Reservation)

“मराठा आरक्षणाचा स्थगिती आदेश उठवण्यासाठी गांभीर्यपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्य सरकारनं हे करावं. महाविकासआघाडी सरकार आमच्या बाबतीत दुजाभाव करतं आहे. मुंबईत डान्सबारच्या बाबतीत चार वेळा अध्यादेश काढले, तर मग मराठा आरक्षणाच्या बाबतीत का नाही,” असा सवालही राजेंद्र कोंढरे यांनी उपस्थितीत केला.

“मराठा समाजाच्या आरक्षणावरची स्थगिती उठवण्यासाठी मुख्य न्यायाधिशांना राज्य सरकारनं विनंती करावी. ही स्थगिती उठवणं ही आमची पहिली मागणी आहे. ही स्थगिती मिळताच राज्य सरकारनं त्वरीत नवीन आदेश काढत आरक्षणात मिळालेल्या गोष्टी थांबवण्यात आल्याच कळतं आहे,” असेही राजेंद्र कोंढरे म्हणाले.

“अनेक मंत्री हे मराठा समाजासोबत दुजाभाव ठेवतात. लोकांना आता हे लक्षात आलंय की मराठा समाजाच्या प्रत्येक गोष्टीत अडथळा आणायच काम होतं आहे. मग आता निदर्शन कशी थांबवायची? ॲडमिशनच्या पाईपलाईनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देणार की नाही?” असे अनेक प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केले.

“आम्हाला अतिरिक्त फायदा देऊ नका. पण आमच्यावर अन्याय होता कामा नये. विद्यार्थ्यांना दिलासा मिळणं हे खूप महत्वाचं आहे,” असेही यावेळी त्यांनी सांगितले.

“येत्या 23 सप्टेंबरला कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. यात विविध क्षेत्रातली सर्व तज्ञ मंडळी एकत्र येतील. या परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार, राज्यभरातून मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते, पदाधिकारी परिषदेत सहभागी होणार आहे. तसेच येत्या 17 सप्टेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन केली जाणार आहेत.” (Maratha Kranti Morcha Press Conference on Maratha Reservation)

संबंधित बातम्या : 

मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे अकरावीची प्रवेशप्रक्रिया लांबणीवर, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर निर्णय

मराठा आरक्षणावर कोल्हापूरमध्ये 23 सप्टेंबरला राज्यव्यापी गोलमेज परिषद

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.