AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा क्रांती मोर्चाचा आज वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आक्रोश’, संभाजीराजे छत्रपती सहभागी होणार

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. स्थगितीनंतर आतापर्यंत राज्य सरकारनं कुठलंही पाऊल उचललं नाही, असा आरोप करत आज मराठा क्रांती मोर्चाकडून वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतीही या आंदोलनात सहभाग नोंदवणार आहेत.

मराठा क्रांती मोर्चाचा आज वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर 'आक्रोश', संभाजीराजे छत्रपती सहभागी होणार
| Updated on: Oct 26, 2020 | 7:58 AM
Share

मुंबई: मराठा क्रांती मोर्चातर्फे आज वांद्रे इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतीही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. शनिवारी मराठा क्रांती मोर्चानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली होती. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर गेल्या दीड महिन्यात सरकारनं कुठलंही पाऊल उचललं नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चानं केला आहे. (Maratha Kranti Morcha andolan at bandra collector office)

आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीनंतर सरकारनं कुठलीच पावलं उचलली नाहीत. त्यामुळं मराठा समाजातील विद्यार्थी, तरुणांना शिक्षण आणि नोकरीतील संधींपासून वंचित राहावं लागत आहे. राज्य सरकारनं आधी १२ हजारांची पोलील भरती जाहीर केली आणि आता ऊर्जा खात्यात 9 हजार पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, आरक्षणाअभावी या भरती प्रक्रियेत मराठा समाजाला स्थान मिळणार नसल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात येतोय. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत राज्य सरकारनं कुठल्याही प्रकारची नोकरभरती करु नये अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नावर २७ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल कऱण्यात येणार आहे. या याचिकेबाबत काय तयारी करण्यात आली आहे, याबाबतही माहिती देण्यात येत नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात येत आहे.

‘यापुढे आंदोलनं तीव्र असतील!’ 

मराठा आरक्षणाचा प्रश्न कोर्टात मार्गी लागत नसेल तर राज्य सरकारनं मराठा समाजासाठी संपूर्ण पर्यायी व्यवस्था उभी करावी, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. तसंच आतापर्यंत १८ ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन ठिय्या आंदोलन केलं गेलं. पण यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून सरकारला देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

मराठा क्रांती मोर्चाचं मोठं पाऊल, मुख्यमंत्र्यांकडे पोहोचलं रक्ताने सह्या केलेलं पत्र

‘प्रकाश आंबेडकर मुर्दाबाद’, राजेंवरील टीकेनंतर मराठा क्रांती मोर्चात संताप, तुळजापुरात घोषणाबाजी

Maratha Kranti Morcha andolan at bandra collector office

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.