AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पती-पत्नीच्या सरकारमुळे बिहार आजारी, आम्ही इलाज करुन दाखवला, नितीश कुमारांचा हल्लाबोल

पती-पत्नीच्या सरकारमुळे बिहार आजारी होतं पण आम्ही इलाज करुन दाखवला, असा हल्लाबोल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला.

पती-पत्नीच्या सरकारमुळे बिहार आजारी, आम्ही इलाज करुन दाखवला, नितीश कुमारांचा हल्लाबोल
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Oct 12, 2020 | 11:19 PM
Share

पाटणा : लालूप्रसाद यादव आणि राबडीदेवी पती-पत्नीने 15 वर्ष बिहारवर राज्य केलं. त्यावेळी बिहारमध्ये कोणत्याही प्रकारची आरोग्य व्यवस्था नव्हती. बिहार आजारी होतं. मात्र आमच्या काळात आम्ही सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था उभारली. आम्ही इलाज काय असतो हे जनतेला दाखवून दिलं, असं टीकास्त्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोडलं आहे. (Nitish Kumar Attacked On lalu prasad yadav And Rabri Devi)

बिहार निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातला प्रचार सुरु झाला आहे. आज (सोमवारी) नितीश कुमार यांनी जेडीयू कार्यालयामधून व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी नितीश कुमार आणि राबडीदेवी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.

“आमचं उदिष्ट आहे की बिहारच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत विकास झाला पाहिजे. समाजातल्या अंतिम लोकांपर्यंत सरकारचं काम पोहचलं पाहिजे. सरकारच्या योजना पोहचल्या पाहिजे. केंद्र सरकारशी मिळून कोव्हिड काळात बिहार सरकारने उत्तम काम केलं. अगोदरच्या सरकारच्या काळात 1 महिन्याला 39 लोक सरकारी दवाखान्यात जायचे. आम्ही मोफत औषधे देणं सुरु केल्यावर एका महिन्यात जवळपास 10 हजार लोक सरकारी इस्पितळात जायला लागले”, असा दावा नितीश कुमार यांनी केला.

महिलांचा मोठ्या प्रमाणात विकास

“जनतेची सेवा करणं माझा धर्म आहे. आम्ही समाजातल्या सगळ्या वर्गांसाठी काम केलं आहे. आम्ही महिलांसाठी मोठं काम केलंय. महिलांना आरक्षण दिलंय. गेल्या सरकारच्या काळातील आणि आजच्या सरकारच्या काळातील महिलांच्या विकासाची तुलना केली तर लक्षात येईल की आमच्या सरकारने नक्कीच महिलांसाठी मोठं काम केलंय”, असं नितीश कुमार म्हणाले.

जनतेसाठी आमचं मोठं काम

कोरोनाच्या काळात जनतेसाठी आम्ही अहोरात्र काम केलंय. परंतु विरोधक सरकारच्या चुका काढत असतात. पण जनतेला हे चांगलं माहितीये की सरकारने किती काम केलंय. कोरोनाकाळात आमच्याएवढं काम दुसरं कुणीच केलं नसेल. विरोधक फक्त आरोप करत आहेत, असं नितीश कुमार म्हणाले.

(Nitish Kumar Attacked On lalu prasad yadav And Rabri Devi)

संबंधित बातम्या

निवडणूक प्रचारात गळाभेटीवर बंदी; बिहार सरकारचे फर्मान

बिहार निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार?; शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मोदी, शाहांसह फडणवीस करणार बिहारमध्ये प्रचार; भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

बिहारसाठी काँग्रेसची स्टार प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातून फक्त संजय निरुपम यांचा समावेश

Follow Us
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....