AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात सहलीसाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

पुणे : पुण्यातील सहलीसाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा मुळशी धरणात बुडाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. यात एक मुलगी आणि दोन मुलांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी पुण्यातील भारती विद्यापीठातील आहेत. या बुडालेल्या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. संगीता नेगी, शुभम राज सिन्हा आणि शिव कुमार अशी या बुडालेल्या तीन विद्यार्थ्यांची नावे आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त काल […]

पुण्यात सहलीसाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
| Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM
Share

पुणे : पुण्यातील सहलीसाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा मुळशी धरणात बुडाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. यात एक मुलगी आणि दोन मुलांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी पुण्यातील भारती विद्यापीठातील आहेत. या बुडालेल्या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. संगीता नेगी, शुभम राज सिन्हा आणि शिव कुमार अशी या बुडालेल्या तीन विद्यार्थ्यांची नावे आहेत.

महाराष्ट्र दिनानिमित्त काल सुट्टी असल्याने दहा विद्यार्थी वळणे गावात सहलीसाठी आले होते. रात्री जागरण केल्यानंतर आज सकाळी त्यातील काही जण मुळशी धरणात पोहोण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं हे तीन विद्यार्थी बुडाले. हे सर्व विद्यार्थी भारती विद्यापीठात एमबीएचे शिक्षण घेत होते.

दरम्यान सध्या मुळशी धरणातून बुडालेल्या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या ठिकाणी इतर दोन विद्यार्थ्यांचा मृतदेह शोधण्याचं काम स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने युद्धपातळीवर सुरु आहे.

याआधी 9 एप्रिलला पवना धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या दोन इंजिनिअरींग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. सुजीत जनार्दन घुले आणि रोहित राजकुमार कोडगिरे (21, रा. नांदेड) अशी या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत.

पाहा व्हिडीओ :

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.