World Water Day 2021 : गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे देखील ठरू शकते धोकादायक! जाणून घ्या…

आपल्या आरोग्यासाठी नियमित आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. आपल्या शरीरात 60 टक्के पाणी असते.

World Water Day 2021 : गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे देखील ठरू शकते धोकादायक! जाणून घ्या…
पाणी
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 12:29 PM

मुंबई : आपल्या आरोग्यासाठी नियमित आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. आपल्या शरीरात 60 टक्के पाणी असते. शरीरामध्ये लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, पोषक तत्त्वांचे परिवहन, शरीरातील तापमानाचे व्यवस्थापन, चयापचयातील विषारी पदार्थाचे विसर्जन आदी क्रिया होण्यासाठी पाणी अत्यावश्यक असते. मात्र, शरीरासाठी पाणी पिणे फायदेशीर असल्यामुळे काही लोक प्रमाणाच्या बाहेर पाणी पितात. (Drinking too much water is also dangerous to health)

याचे घातक परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात. चला तर मग बघूयात आपल्या शरीरासाठी किती पाणी पिणे योग्य आहे. तज्ज्ञांच्या मते, निरोगी शरीरासाठी दोन लिटर ते चार लिटर पाणी पुरेसे आहे. परंतु जर आपण व्यायाम किंवा कठोर परिश्रम घेत असला तर पाच ते सहा लिटर पाणी प्यावे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, पाणी कमी पिले किंवा जास्त पिले तरी ते आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायक आहे.

पाणी पिण्याने शरीरातील घातक गोष्टीबाहेर पडतात आणि शरीरात साठलेली जादा चरबी कमी होते. ज्यामुळे लठ्ठपणा नियंत्रित होतो. परंतु जर आपण दररोज जास्त पाणी पित असाल तर मूत्रपिंडा संदर्भातील अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते जेवणादरम्यान पाणी पिणे सुरक्षित आहे. परंतु, जेवण खाण्यापूर्वी किंवा नंतर ताबडतोब पाणी प्यायल्याने पाचन संस्थेला त्रास होतो आणि पचनक्रिया बिघडते.

वास्तविक, खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे जठरासंबंधी रस पाचन तंत्रामधून सोडलेल्या पाचन एंजाइममध्ये विरघळून जातात. ज्यामुळे शरीराला अन्नामधून पुरेसे पोषकद्रव्य मिळत नाही. याशिवाय गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटीसारख्या समस्या होण्याचीही शक्यता निर्माण होते. आयुर्वेदात असे म्हटले आहे की, शरीराच्या तापमानापेक्षा पाण्याचे तप्नाम कमी असू नये. उन्हाळ्यात लोक घरात पाय टाकतातच थंडगार पाणी पितात. ज्यामुळे शरीराची मोठ्या प्रमाणात हानी होते.

परंतु, हिवाळ्यामध्ये लोक पाणी पिण्यास टाळाटाळ करतात आणि यामुळे आपल्या शरीराला खूप त्रास होऊ शकतो. जास्त थंड पाणी पिण्यामुळे शरीरात कमजोरी येते. तसेच हृदयविकाराचा झटका आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोकाही वाढतो. तांबेच्या भांड्यात पाणी ठेवा आणि सकाळी या भांड्यातील पाणी प्या. सलग तीन महिने असे केल्याने तुमच्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढेल. तसेच, आपल्याला मुरुम किंवा त्वचेची समस्या असल्यास ते या आजारांपासूनही आपली सुटका करते.

संबंधित बातम्या : 

(Drinking too much water is also dangerous to health)

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.