AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा, निरोगी आणि तंदुरुस्त आयुष्य जगा!

शरीर निरोगी ठेवण्यासाठी, सर्व पोषक द्रव्यांचे प्रमाण संतुलित केले पाहिजे. पौष्टिक घटकांची कमतरता झाल्यावर जास्त प्रमाणात अनेक आजार उद्भवू शकतात.

Health Tips : हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा, निरोगी आणि तंदुरुस्त आयुष्य जगा!
प्रतिकात्मक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 11:07 AM
Share

मुंबई : आपल्या शरीराला सर्व पोषक तत्त्वांची योग्य प्रमाणात आवश्यकता असते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी, सर्व पोषक द्रव्यांचे प्रमाण संतुलित केले पाहिजे. पौष्टिक घटकांची कमतरता झाल्यावर जास्त प्रमाणात अनेक आजार उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असले पाहिजे. हे लोहापासून बनलेले आहे आणि लाल रक्तपेशींमध्ये ऑक्सिजन पोहोचविण्याचे कार्य करते. (Include these substances in the diet to increase Hemoglobin)

त्याची कमतरता विविध रोगांना कारणीभूत ठरू शकते. पुरुष आणि स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण नेमके किती असले पाहिजेत, हे बघूयात. पुरुषांना 100 मि.ली. सरासरी 13.5 ते 17.5 ग्रॅम हिमोग्लोबिन आवश्यक असते, तर महिलांना 100 मिलीमध्ये 12 ते 15.5 ग्रॅम आवश्यक असते. आपल्या आहारात आपण कोणत्या गोष्टी समाविष्ट करू शकता आणि हिमोग्लोबिनची पातळी राखू शकता हे आम्हाला कळवा.

कलिंगड

कलिंगड खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कलिंगड खाल्याने आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची वाढण्यास मदत होते. कलिंगडमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि ते लोहाच्या कमतरतेवर मात करण्यास मदत करते. याशिवाय शरीराला हायड्रेट ठेवते. कलिंगड खाणे आपल्या निरोगी आणि हेल्दी आरोग्यासाठी खूप चांगले आहे.

हिरव्या भाज्या

आहारात हिरव्या पालेभाज्या खाणे फायदेशीर आहे. विशेष करून आपण पालक खाल्ले पाहिजेत. पालकमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. पालेभाज्यांचा आहारात समावेश केल्याने शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढते.

आंबट फळे

आपण आपल्या आहारात संत्री, लिंबू, द्राक्षे इत्यादींचे सेवन करू शकता. या गोष्टी व्हिटॅमिन सीचा मुख्य स्रोत आहेत. व्हिटॅमिन सी लोह शोषण्यास मदत करते. यामुळे, शरीरात हिमोग्लोबिनची पातळी चांगली राहते. आंबट फळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

डाळिंब

डाळिंबामध्ये लोह, कॅल्शियम, फायबर आणि इतर पौष्टिक पदार्थ असतात. अशक्तपणा असलेल्या लोकांना डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. हे फळ सतत खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

खजूर

खजूर खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. खजूरमध्ये पौष्टिक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. हे लोहाने समृद्ध आहे जे लाल रक्तपेशींची संख्या वाढविण्यात मदत करते.

कडधान्य आणि बिया

आपण आपल्या आहारात भोपळा, चिया, बदाम, काजू आणि शेंगदाणे आणि कडधान्याचा समावेश करा. या गोष्टी लोहयुक्त असतात. ते शरीरात लोह शोषण्यास आणि हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.

संबंधित बातम्या : 

Photo : रोग प्रतिकारकशक्ती वाढवायची आहे?, मग केळी आणि ओट्सची स्मूदी नक्की ट्राय करा

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त कोरफडचे तेल घरच्या घरी कसे बनवाल?; वाचा तर खरं!

(Include these substances in the diet to increase Hemoglobin)

Follow Us
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....