AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोटाची चरबी होईल कमी, ‘या’ मसाल्यांचे पाणी पिताच मिळतील हे आश्चर्यकारक फायदे

स्वयंपाकघरात जेवणात वापरले जाणारे मसाले केवळ जेवणाची चव वाढवत नाही तर ते तुमच्या आरोग्याचीही काळजी घेतात. काही मसाले असे आहेत ज्यांचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

पोटाची चरबी होईल कमी, 'या' मसाल्यांचे पाणी पिताच मिळतील हे आश्चर्यकारक फायदे
SpicesImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Mar 20, 2025 | 8:03 PM
Share

आपल्या भारतीय घराघरांमध्ये मसालेदार जेवण खुप आवडीने सेवन करत असतात. प्रत्येक शहरात, गावात, राज्यात तुम्हाला एक अनोखी चव आणि पांरपारिक पदार्थ पाहायला मिळेल. कारण या सर्वांमध्ये जर काही सौम्य असेल तर ते मसाले आहेत. स्वयंपाक करण्याची पद्धत वेगवेगळी असली तरी प्रत्येक जेवणात वापरले जाणारे बहुतेक मसाले सारखेच असतात. काळी मिरीपासून ते लवंग तसेच प्रत्येक मसल्यात स्वत:चे औषधी गुणधर्म असतात. वजन कमी करण्यासाठी चयापचय वाढवणे महत्वाचे आहे. त्यामुळे काही मसाल्यांचे पाणी तुमच्या अनेक समस्या दूर करू शकतात. .

तुमचे वजन जास्त वाढत असेल तर तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच, केवळ तंदुरुस्त राहण्यासाठीच नव्हे तर निरोगी राहण्यासाठी वजन नियंत्रित करणे देखील महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यास कोणत्या मसाल्याचे पाणी शरीरासाठी उपयुक्त आहे ते आपण आजच्या लेखात जाणुन घेऊयात…

जिरे पाणी प्या

तुम्हाला जर तुमचे वाढते वजन कमी करायचे असल्यास सकाळी उठल्यानंतर जिऱ्याचे पाणी पिणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. ग्लॅमरस आणि फिट राहण्यासाठी सुद्धा तुम्ही जिरे पाणीचे सेवन करू शकता. यासाठी तुम्ही अर्धा चमचा जिरे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर ते उकळवा, गाळून घ्या आणि कोमट प्या.

मेथीच्या दाण्यांचे पाणी

सकाळी उठल्यानंतर मेथीच्या दाण्यांचे पाणी पिणे वजन कमी करण्यास देखील मदत करते आणि मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि त्वचा देखील चमकदार होते.

दालचिनीचे पाणी

वजन नियंत्रित करण्यासाठी तुम्ही दालचिनी चहा दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकता. दालचिनी पाण्यात चांगले उकळा आणि घोट घोट करून प्या. यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात.

बडीशेप पाणी

उन्हाळ्यात वजन नियंत्रित करण्यासाठी बडीशेपचे पाणी प्यावे. हे तुमचे पचन निरोगी ठेवण्यास देखील मदत करते. ज्यांना बद्धकोष्ठता, आम्लपित्त किंवा सकाळी आजारपणाची समस्या आहे त्यांच्यासाठीही बडीशेप पाणी फायदेशीर आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.