AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तोपर्यंत शिंदेंना मंत्रिमंडळात घेऊच नका; आदित्य ठाकरेंची फडणवीसांकडे मोठी मागणी

भाजपकडून मुंबई रस्ता घोटाळ्याच्या एसआयटी चौकशीची मागणी करण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

...तोपर्यंत शिंदेंना मंत्रिमंडळात घेऊच नका; आदित्य ठाकरेंची फडणवीसांकडे मोठी मागणी
| Updated on: Dec 14, 2024 | 3:57 PM
Share

आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजप  आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईतील रस्ता घोटाळ्याची एसआयटी चौकशी लावा अशी मागणी मुंबई भाजपाकडून होत आहे, यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

मुंबई भाजपकडून मुंबई रस्ता घोटाळाप्रकरणात एसआयटी चौकशी लावण्याची मागणी होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईतील रस्त्याच्या घोटाळ्याची चौकशी करा हेच मी बोलत होतो. जी मी मागणी करत होतो, तीच मागणी आता भाजप करत आहे. खोके सरकारच्या देखरेखीत मोठा घोटाळा झाला आहे. आता फडणवीसांचं सरकार आलं आहे, त्यांना आता स्वच्छ सरकार चालवण्याची खरोखर मोठी संधी आहे, त्यांना जर स्वच्छ सरकार चालवायचं असेल तर त्यांनी चौकशी पूर्ण होईलपर्यंत एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात घेऊ नये, अशी मागणी यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, जोपर्यंत हे सिद्ध होत नाही की या सर्वामध्ये त्यांचा हात नाही, आणि ठेकेदाराचा फायदा झाला नाही. तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळापासून बाजुला ठेवावे तर आणि तरच आम्ही समजू की हे सरकार वाशिंग मशिन सरकार नाही.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून देखील भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचं हिंदुत्व हे फक्त निवडणुकीपुरतं आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपचं निवडणुकीपुरत हिंदुत्व समोर आणलं आहे. भाजप शासित राज्यातच हिंदुत्व धोक्यात आहे.  दादरमधील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या मारूतीच्या मंदिराला नोटीस देण्यात आली, त्यांच्याच सरकारने दिलेल्या नोटीशीच्या विरोधात त्यांच्याच लोकांनी आंदोलन केलं आणि घाई गरबडीमध्ये या नोटीशीला स्थगिती दिली असंही यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.