AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : अजित पवार आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूर परिस्थितीचा आढावा घेणार

अजित पवार (Ajit Pawar) हे आज गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील पूर (Flood) परिस्थितीची पहाणी करून, नुकसानाचा आढावा घेणार आहेत.

Ajit Pawar : अजित पवार आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूर परिस्थितीचा आढावा घेणार
Image Credit source: TV9marathi
| Updated on: Jul 28, 2022 | 8:50 AM
Share
गडचिरोली : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे आज गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील पूर (Flood) परिस्थितीची पहाणी करून, नुकसानाचा आढावा घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा मोठा फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे. एक जूनपासून ते आतापर्यंत नदी-नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पावसामुळे झालेल्या विविध अपघातात 76 पशुधन दगावले आहे. पुरामुळे गडचिरोली जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले असून, तब्बल  47 गावांना या पुराचा फटका बसला आहे. पुरात होत्याच नव्हत झाल्यानं नागरिक रस्त्यावर आले असून, सरकारने मदत करावी अशी मागणी ते करत आहेत. आज अजित पवार हे गडचिरोलीमध्ये जाऊन तेथील पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

जिल्ह्यात पुराचे थैमान

जिल्ह्यात  गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरूच होता. पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. या पुराचा मोठा फटका जिल्ह्यातील ग्रामीण भागांना बसला आहे. 16268 हेक्टर शेतजमीन पुराच्या पाण्यात गेल्याने पिकं पूर्णपणे नष्ट झाली आहेत. शेतकऱ्यांवर दुपारपेरणीची वेळ आली आहे. तसेच या पवासांत आतापर्यंत सुमारे 6481 घरे पडल्याची नोंद झाली आहे. घरे पडल्याने लोकांचे संसार उघडल्यावर आले आहेत.  या पुराचा फटका हा एकूण 47  गावांना बसला असून, लोक हवालदिल झाले आहेत. जूनपासून ते आतापर्यंत पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनेत बारा जणांचा मृत्यू झाला आहे. आता हे नुकसानग्रस्त शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचा सर्व्हे सुरू आहे. हा सर्व्हे पूर्ण होण्यास 15 दिवस लागण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज अजित पवार हे  गडचिरोलीचा दौरा करणार आहेत.

राज्याच्या इतर भागातही पुरामुळे नुकसान

राज्यात काही दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा राज्यातील विविध विभागांना मोठा फटका बसला आहे. कोकण आणि विदर्भात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. हजारो हक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने पिके हातची गेली त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो मात्र यंदा मराठवाड्यात देखील मोठ्याप्रमाणात पाऊस झाला असून, शेतकऱ्यांना पुराचा फटका बसला आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.