AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : भाजपवाल्यांना कोणी चापटीही मारणार नाही… दानवेंच्या सुरक्षेवरून संजय राऊतांचा टोला काय?

माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची वाय प्लस सुरक्षा काढल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपवर तीव्र टीका केली. भाजप आणि संघाच्या लोकांना कसलाही धोका नाही, ते निरर्थक लोक आहेत. सुरक्षेचा वापर केवळ स्वतःचे महत्त्व दाखवण्यासाठी होतो, असे राऊत म्हणाले. चंद्रपूरमधील राजकीय गटबाजीमुळे झालेल्या परिणामांवरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Sanjay Raut : भाजपवाल्यांना कोणी चापटीही मारणार नाही... दानवेंच्या सुरक्षेवरून संजय राऊतांचा टोला काय?
संजय राऊत
| Updated on: Feb 21, 2026 | 11:55 AM
Share

माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची वाय प्लस सुरक्षा गृह विभागाने काढली आहे. सुरक्षा पुनरावलोकन समितीच्या अहवाला नंतर हा निर्णय घेण्यात आला. अंबादास दानवे यांचा विरोधी पक्षनेते पदाचा कालावधी संपल्यानंतर वाय प्लस सुरक्षा काढून घेण्यात आली. याच मुद्यावरून बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला टोला लगावला आहे. मालेगाव कोर्टात हजर होण्यापूर्वी ते माध्यमांशी संवाद? साधत होते. दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता,त्यासंदर्भातील सुनावणीसाठी ते मालेगावात होते. सुनावणीपूर्वी ते विविध मुद्यांवरून माध्यमांशी बोलले, तेव्हाच त्यांनी भाजपावर टीका केली. संघ आणि भाजपवाल्यांना अजिबात धोका नाही. त्यांना कोणी चापटीही मारणार नाही. निरर्थक लोकं आहेत ते, अशा शब्दांत राऊतांनी टीकास्त्र सोडलं.

काय म्हणाले राऊत ?

खरं सांगायचं तर कोणीही, सेक्युरिटीची फार सोस धरू नये. या देशात फक्त भाजप आणि संघाच्या लोकांनाच धोका आहे. त्यामुळे झेडप्लस, डबल झेड प्लस, एनएसजी कमांडो किंवा सेक्युरिटी त्यांनाच, किंवा शिदेंसोबत जे लोक फुटून गेलेत त्यांनाच सुरक्षेची गरज. बाकी इतर पक्षाचे लोकं निर्भय आहेत. आमच्या आसपास येण्याची कुणाची हिंमत नाही, असं माझं मत आहे, असं राऊतांनी सुनावलं. त्यामुळे सेक्युरिटी ठेवली काय आणि काढली काय त्याचा आम्ही लोकांनी बाऊ करू नये. सेक्युरिटी कुणाला, तर त्यांना ( भाजप- शिंदे गट वगैरे) मिळते. पण संघ आणि भाजपवाल्यांना अजिबात धोका नाही. त्यांना कोणी चापटीही मारणार नाही, निरर्थक लोकं आहेत ते असा टोला राऊतांनी लगावला.  पण सुरक्षा घेऊन आम्ही कुणी तरी मोठे आहोत. आमच्या जीवाला किती धोका, आम्ही किती राष्ट्रकार्य करतो हे दाखवत आहेत. त्यांचं राष्ट्र कार्य काय हे दिसतंय अशी टीकाही त्यांनी केली.

आपापसातील गटबाजीमुळे चंद्रपूरच्या राजकारणावर झाला परिणाम

उबाठामुळे चंद्रपुरात महापौर झाला नाही असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते. त्यांच्या या विधानाच राऊत यांनी समाचार घेतला. हे अगदी चुकीचं आहे. आमच्यामुळे काहीही झालेलं नाही, अस त्यांनी स्पष्ट केलं. तुमच्या आपापसातील गटबाजीमुळे हे झालं. आम्ही तुमच्यासोबतच होतो, म्हणूनच दिल्लीमध्ये या दोन्ही गटांना समजावण्यासाठी उच्चपातळीवर बैठक झाली. त्यात त्यांना समज दिली. दोन्ही गट एकत्र आले नाही, त्याचाच परिणाम चंद्रपूरच्या राजकारणावर झाला अशा शब्तांत राऊतांनी स्पष्ट सुनावलं.

चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर.
भाजप- संघाला कुठलाही धोका नाही; सुरक्षा घेऊन... संजय राऊतांचा घणाघात
भाजप- संघाला कुठलाही धोका नाही; सुरक्षा घेऊन... संजय राऊतांचा घणाघात.
सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट राज ठाकरे यांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट राज ठाकरे यांचा हल्लाबोल.
ज्यांनी विरोध केला त्यांनी व्याख्यानाला यावे;अमोल कोल्हे स्पष्टच बोलले
ज्यांनी विरोध केला त्यांनी व्याख्यानाला यावे;अमोल कोल्हे स्पष्टच बोलले.
शेतकरी संतापला! थेट ट्रॅक्टरभर मका जिल्हाधिकारी कार्यालयात
शेतकरी संतापला! थेट ट्रॅक्टरभर मका जिल्हाधिकारी कार्यालयात.
भाजपाला मोठा धक्का! भिवंडी महापौर निवडणुकीत राजकीय उलथापालथ
भाजपाला मोठा धक्का! भिवंडी महापौर निवडणुकीत राजकीय उलथापालथ.
महाराष्ट्र ICUमध्ये, सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट; ठाकरे यांचा इशारा
महाराष्ट्र ICUमध्ये, सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट; ठाकरे यांचा इशारा.
एकनाथ शिंदे- राज ठाकरे भेटीवर, राज ठाकरे स्पष्टच बोलले...
एकनाथ शिंदे- राज ठाकरे भेटीवर, राज ठाकरे स्पष्टच बोलले....
संदीप देशपांडेंचं व्हॉट्सअप स्टेट्स अन् किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
संदीप देशपांडेंचं व्हॉट्सअप स्टेट्स अन् किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
आधार-राशन कार्ड देणारी माणसं आपलीच; कारवाई कोण करणार?
आधार-राशन कार्ड देणारी माणसं आपलीच; कारवाई कोण करणार?.