AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : भाजपवाल्यांना कोणी चापटीही मारणार नाही… दानवेंच्या सुरक्षेवरून संजय राऊतांचा टोला काय?

माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची वाय प्लस सुरक्षा काढल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपवर तीव्र टीका केली. भाजप आणि संघाच्या लोकांना कसलाही धोका नाही, ते निरर्थक लोक आहेत. सुरक्षेचा वापर केवळ स्वतःचे महत्त्व दाखवण्यासाठी होतो, असे राऊत म्हणाले. चंद्रपूरमधील राजकीय गटबाजीमुळे झालेल्या परिणामांवरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Sanjay Raut : भाजपवाल्यांना कोणी चापटीही मारणार नाही... दानवेंच्या सुरक्षेवरून संजय राऊतांचा टोला काय?
संजय राऊत
| Updated on: Feb 21, 2026 | 11:55 AM
Share

माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची वाय प्लस सुरक्षा गृह विभागाने काढली आहे. सुरक्षा पुनरावलोकन समितीच्या अहवाला नंतर हा निर्णय घेण्यात आला. अंबादास दानवे यांचा विरोधी पक्षनेते पदाचा कालावधी संपल्यानंतर वाय प्लस सुरक्षा काढून घेण्यात आली. याच मुद्यावरून बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला टोला लगावला आहे. मालेगाव कोर्टात हजर होण्यापूर्वी ते माध्यमांशी संवाद? साधत होते. दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता,त्यासंदर्भातील सुनावणीसाठी ते मालेगावात होते. सुनावणीपूर्वी ते विविध मुद्यांवरून माध्यमांशी बोलले, तेव्हाच त्यांनी भाजपावर टीका केली. संघ आणि भाजपवाल्यांना अजिबात धोका नाही. त्यांना कोणी चापटीही मारणार नाही. निरर्थक लोकं आहेत ते, अशा शब्दांत राऊतांनी टीकास्त्र सोडलं.

काय म्हणाले राऊत ?

खरं सांगायचं तर कोणीही, सेक्युरिटीची फार सोस धरू नये. या देशात फक्त भाजप आणि संघाच्या लोकांनाच धोका आहे. त्यामुळे झेडप्लस, डबल झेड प्लस, एनएसजी कमांडो किंवा सेक्युरिटी त्यांनाच, किंवा शिदेंसोबत जे लोक फुटून गेलेत त्यांनाच सुरक्षेची गरज. बाकी इतर पक्षाचे लोकं निर्भय आहेत. आमच्या आसपास येण्याची कुणाची हिंमत नाही, असं माझं मत आहे, असं राऊतांनी सुनावलं. त्यामुळे सेक्युरिटी ठेवली काय आणि काढली काय त्याचा आम्ही लोकांनी बाऊ करू नये. सेक्युरिटी कुणाला, तर त्यांना ( भाजप- शिंदे गट वगैरे) मिळते. पण संघ आणि भाजपवाल्यांना अजिबात धोका नाही. त्यांना कोणी चापटीही मारणार नाही, निरर्थक लोकं आहेत ते असा टोला राऊतांनी लगावला.  पण सुरक्षा घेऊन आम्ही कुणी तरी मोठे आहोत. आमच्या जीवाला किती धोका, आम्ही किती राष्ट्रकार्य करतो हे दाखवत आहेत. त्यांचं राष्ट्र कार्य काय हे दिसतंय अशी टीकाही त्यांनी केली.

आपापसातील गटबाजीमुळे चंद्रपूरच्या राजकारणावर झाला परिणाम

उबाठामुळे चंद्रपुरात महापौर झाला नाही असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते. त्यांच्या या विधानाच राऊत यांनी समाचार घेतला. हे अगदी चुकीचं आहे. आमच्यामुळे काहीही झालेलं नाही, अस त्यांनी स्पष्ट केलं. तुमच्या आपापसातील गटबाजीमुळे हे झालं. आम्ही तुमच्यासोबतच होतो, म्हणूनच दिल्लीमध्ये या दोन्ही गटांना समजावण्यासाठी उच्चपातळीवर बैठक झाली. त्यात त्यांना समज दिली. दोन्ही गट एकत्र आले नाही, त्याचाच परिणाम चंद्रपूरच्या राजकारणावर झाला अशा शब्तांत राऊतांनी स्पष्ट सुनावलं.

Follow Us
NEET पेपरफुटीचा गॉडफादर कोण? पुण्यात CBI चा मोठा छापा!
NEET पेपरफुटीचा गॉडफादर कोण? पुण्यात CBI चा मोठा छापा!.
शिवतीर्थवर ठाकरेंच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन! त्या केकची होतेय चर्चा
शिवतीर्थवर ठाकरेंच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन! त्या केकची होतेय चर्चा.
ऑडिओ क्लिप मान्य तरी अटक का नाही? अंबींचा पोलिसांना खडेबोल सवाल
ऑडिओ क्लिप मान्य तरी अटक का नाही? अंबींचा पोलिसांना खडेबोल सवाल.
अंधश्रद्धेचा क्लास? मोटेगावकरचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल
अंधश्रद्धेचा क्लास? मोटेगावकरचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल.
ठाकरे गटाला मोठा धक्का! चव्हाण यांच्या उपस्थितीत मोठा पक्षप्रवेश
ठाकरे गटाला मोठा धक्का! चव्हाण यांच्या उपस्थितीत मोठा पक्षप्रवेश.
कोकणात मान्सूनपूर्व पावसाची दमदार बॅटिंग! हापूस आंब्याला मोठा फटका
कोकणात मान्सूनपूर्व पावसाची दमदार बॅटिंग! हापूस आंब्याला मोठा फटका.
मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना..
मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना...
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला....
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला.....
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन.