Aurangabad Gram Panchayat Election Results 2021: औरंगाबादेत महाविकास आघाडीने खातं खोललं, आडगाव ग्रामपंचायत बहुमताने खिशात
औरंगाबादेत महाविकास आघाडीने खात खोललं असून आघाडीने आडगाव ग्रामपंचायतीत विजय मिळवला आहे. (aurangabad grampanchayat election)
औरंगाबाद : संपूर्ण राज्यात मतमोजणीला सुरवात झाली आहे. हळूहळू निकाल समोर येत असून औरंगाबादेत महाविकास आघाडीने खात खोललं आहे. आघाडीने आडगाव ग्रामपंचायतीत विजय मिळवला आहे. आगडगाव येथील 11 पैकी तब्बल 10 जागांवर विजय मिळवीत बहुमताने निवडणकू जिंकली आहे. ( in aurangabad Maha Vikas aghadi won its first grampanchayat election)
राज्यात 16 जानेवारी रोजी ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. त्यानंतर आता संपूर्ण राज्यात मतमोजणी होत आहे. औरंगाबादेतही मतदान मोजणीकेंद्रांसमोर स्थानिक पुढाऱ्यांनी गर्दी केली असून यंदाचा विजयाचा गुलाल कुणाचा असेल याची उत्सुकता लागली आहे. यातच औरंगाबादेतील आडगाव ग्रामपंचायतीचा निकाल समोर आला आहे. येथे महाविकास आडीचा विजय झाला असून जिल्ह्यात महाविकास आघाडीने खातं खोललं आहे. येथे महाविकास आघाडीने एकूण 11 जागांपैकी तब्बल 10 जागांवर विजय विजय मिळवला आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालापैकी आडगावच्या माध्यमातून महाविकास आघाडीन खातं खोलल्यामुळे येथे जल्लोष साजरा होतोय. येथील निडणूक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची केली होती. आज दुपारपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व निकाल स्पष्ट होतील. मात्र, महाविकास आघाडीने पहिलाच विजय मिळवल्यामुळे आडगावमध्ये महाविकास आघाडीकडून आंनद साजरा केला जातोय.
दरम्यान राज्यातील 12,711 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीतून एकूण 2 लाख 14 हजार उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. ग्रामीण भागाच्या राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी 80 टक्के मतदान झाले. एकूण 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. 1523 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यात 26,178 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण 46,921 प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली.
( in aurangabad Maha Vikas aghadi won its first grampanchayat election)
संंबंधित बातम्या :