AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Gram Panchayat Election Results 2021: औरंगाबादेत महाविकास आघाडीने खातं खोललं, आडगाव ग्रामपंचायत बहुमताने खिशात

औरंगाबादेत महाविकास आघाडीने खात खोललं असून आघाडीने आडगाव ग्रामपंचायतीत विजय मिळवला आहे. (aurangabad grampanchayat election)

Aurangabad Gram Panchayat Election Results 2021:  औरंगाबादेत महाविकास आघाडीने खातं खोललं, आडगाव ग्रामपंचायत बहुमताने खिशात
| Updated on: Jan 18, 2021 | 10:02 AM
Share

औरंगाबाद : संपूर्ण राज्यात मतमोजणीला सुरवात झाली आहे. हळूहळू निकाल समोर येत असून औरंगाबादेत महाविकास आघाडीने खात खोललं आहे. आघाडीने आडगाव ग्रामपंचायतीत विजय मिळवला आहे. आगडगाव येथील 11 पैकी तब्बल 10 जागांवर विजय मिळवीत बहुमताने निवडणकू जिंकली आहे. ( in aurangabad Maha Vikas aghadi won its first grampanchayat election)

राज्यात 16 जानेवारी रोजी ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. त्यानंतर आता संपूर्ण राज्यात मतमोजणी होत आहे. औरंगाबादेतही मतदान मोजणीकेंद्रांसमोर स्थानिक पुढाऱ्यांनी गर्दी केली असून यंदाचा विजयाचा गुलाल कुणाचा असेल याची उत्सुकता लागली आहे. यातच औरंगाबादेतील आडगाव ग्रामपंचायतीचा निकाल समोर आला आहे. येथे महाविकास आडीचा विजय झाला असून जिल्ह्यात महाविकास आघाडीने खातं खोललं आहे. येथे महाविकास आघाडीने एकूण 11 जागांपैकी तब्बल 10 जागांवर विजय विजय मिळवला आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या निकालापैकी आडगावच्या माध्यमातून महाविकास आघाडीन खातं खोलल्यामुळे येथे जल्लोष साजरा होतोय. येथील निडणूक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची केली होती. आज दुपारपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व निकाल स्पष्ट होतील. मात्र, महाविकास आघाडीने पहिलाच विजय मिळवल्यामुळे आडगावमध्ये महाविकास आघाडीकडून आंनद साजरा केला जातोय.

दरम्यान राज्यातील 12,711 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीतून एकूण 2 लाख 14 हजार उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. ग्रामीण भागाच्या राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी 80 टक्के मतदान झाले. एकूण 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. 1523 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यात 26,178 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण 46,921 प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली.

( in aurangabad Maha Vikas aghadi won its first grampanchayat election)

संंबंधित बातम्या :

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | राज्यातील 10 मोठे निकाल, कुठे कोण जिंकलं?

अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021 : आण्णा हजारे, पोपटराव, विखे, थोरात, रोहित पवार, राम शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

निवडणुकीचे प्रत्येक अपडेट लाईव्ह LIVETV

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.