AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी अपडेट, एका आरोपीला अटक? संजय शिरसाट यांनी दिली महत्त्वाची माहिती

शिवसेना नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हे लोण दुसरीकडे पसरू नये, यासाठी या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे संजय शिरसाट म्हणाले.

संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी अपडेट, एका आरोपीला अटक? संजय शिरसाट यांनी दिली महत्त्वाची माहिती
sanjay shirsat santosh deshmukh
| Updated on: Dec 23, 2024 | 3:42 PM
Share

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या घटनेने बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडकाफडकी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी केली होती. तसेच याप्रकरणी आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल, असेही आश्वासन दिले होते. आता शिवसेना नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हे लोण दुसरीकडे पसरू नये, यासाठी या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे संजय शिरसाट म्हणाले.

संजय शिरसाट यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संतोष देशमुख यांची हत्या दुर्दैवी आहे. याप्रकरणी आरोपीला अटक झाल्याचे समजते आहे. पण अद्याप याबद्दल स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मी याची आणखी परिपूर्ण माहिती घेत आहे. त्यानंतरच याबद्दल बोलेन, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.

हिवाळी अधिवेशन चालू असताना अनेक आमदारांनी बीडचा प्रश्न सभागृहात मांडला. मला कालच एकनाथ शिंदे साहेबांनी इकडे यायला सांगितले. मी आधी पोलिसांची भेट घेतली. संभाजीनगरहून इथे येत असताना मी सतत संतोषचे फोटो बघत होतो. ते बघून माझ्या मनात चीड येत होती की इतक्या अमानुषपणे संतोषला कोण मारु शकतं. त्याच्या डोळे आणि पाठीवरचे वर्ण पाहिले. जर हे असेच वातावरण राहिले तर बीडमध्ये पुन्हा तीच दहशत निर्माण होईल, असेही संजय शिरसाट म्हणाले.

आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे

बीडमध्ये अनेक लोक या धंद्यामध्ये गुंतले आहेत. आरोपींनी लवकर अटक करणार आहे, असे इथल्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले. आरोपी कोणीही असेल त्याला सोडणार नाही असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. हे लोण दुसरीकडे पसरू नये, यासाठी या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही संजय शिरसाट यांनी सांगितले.

बीडचे राजकारण बदलले पाहिजे

कोण कोणत्या पक्षाचा आहे, हा विषय आपल्या समोर नाही. माणुसकी म्हणून पाहणार आहोत. बीडमध्ये नोकरी करण्यास अधिकारी येत नाहीत. एवढी दहशत आहे. लोकांनी आता बीडचे राजकारण बदलले पाहिजे. संतोष यांची हत्या दुर्दैवी आहे. याप्रकरणी आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन मी देतो. याप्रकरणी एकाला अटक केल्याचेही समजते. पण अद्याप याबद्दल ठोस माहिती नाही. म्हणून मी यावर बोलणार नाही. न्यायाला दाबण्याचा प्रयत्न करू नका, असेही संजय शिरसाट म्हणाले.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.