AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara Rain | भंडारा शहरात घरात घुसले पावसाचे पाणी, आनंद मंगल कार्यालयात तलावाचे स्वरूप…

वैशाली नगर, रुक्मिणी नगर या परिसरातील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होते आहे. तर दूसरीकडे खात रोड परिसरात असलेल्या मंगल कार्यालयात गुडघाभर पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप प्राप्त झाले.

Bhandara Rain | भंडारा शहरात घरात घुसले पावसाचे पाणी, आनंद मंगल कार्यालयात तलावाचे स्वरूप...
| Edited By: | Updated on: Aug 09, 2022 | 1:45 PM
Share

भंडारा : काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy rain) भंडारा शहरातील काही भागांमध्ये पाणी शिरल्याने मोठी तारांबळ उडालीयं. भंडारा शहरामध्ये रात्री मुसळधार पावसाला सुरूवात झाली. रोड निर्मितीच्या वेळेस उंच रोड बनवल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाचे पाणी (Water) लोकांच्या घरात जात आहे. रात्रीपासून घरात शिरलेले पाणी काढून नागरिकांना नाकीनऊ आल्याचे चित्र असून महापालिका प्रशासानाविरोधात (Municipal Administration) नागरिक संताप व्यक्त करत आहेत. पावसाच्या पाण्याचा जोर सातत्याने वाढतांना दिसतोयं.

भंडाऱ्यात घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरले पावसाचे पाणी

वैशाली नगर, रुक्मिणी नगर या परिसरातील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होते आहे. तर दूसरीकडे खात रोड परिसरात असलेल्या मंगल कार्यालयात गुडघाभर पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप प्राप्त झाले. या नुकसानाची भरपाई शासनाने लवकरात लवकर द्यावी अशी मागणी आता नागरिक करीत आहेत. रुक्मिणी नगरमध्ये असलेल्या किराणा दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने दुकान मालकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान

ही परिस्थिती दरवर्षी येत असल्याने यापुढे आमच्या घरात किंवा दुकानात पाणी शिरणार नाही अशी व्यवस्था प्रशासनाने करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. राज्यात सध्या सर्वदूर पाऊस पडताना दिसतोयं. मुंबई, पुणे, अमरावतील, नागपूर, गडचिरोली आणि मराठवाड्यात पाऊस सुरू असल्याने अनेक धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलायं. इतकेच नाही तर अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी प्रशासनाकडून नागरिकांना अलर्ट देखील देण्यात आलायं.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.