AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी : अखेर प्रतीक्षा संपली, राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले, निवडणुका जाहीर

राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले असून निवडणूक होणाऱ्या ठिकाणी आजपासूनच आचार संहिता जारी करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रमही जाहीर केला आहे.

मोठी बातमी : अखेर प्रतीक्षा संपली, राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले, निवडणुका जाहीर
ELECTION COMMISION Image Credit source: TV9 NETWORK
| Updated on: Apr 06, 2023 | 7:51 PM
Share

मुंबई : राज्यात बहुचर्चित असलेल्या निवडणुकांची प्रतीक्षा आता संपली आहे. राज्यसभा, विधान परिषद आणि विधानसभा पोटनिवडणुका झाल्या. त्यामुळे राज्यात आणखी काही रिक्त असलेल्या जागांसाठी निवडणूक कधी जाहीर होणार याचीच उत्सुकता लागून राहिली होती. अखेर निवडणूक आयोगाने या निवडणूक जाहीर केल्या आहेत. त्यामुळे राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले असून निवडणूक होणाऱ्या ठिकाणी आजपासूनच आचार संहिता जारी करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रमही जाहीर केला आहे.

राज्यातील विविध ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवडणुका होणार आहेत. यासाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे.

सदस्याचे निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र 25 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत दाखल करता येणार आहेत. मात्र, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत.

उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी 3 मे 2023 रोजी होईल. 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होऊन 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 19 मे 2023 रोजी होणार आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.

Follow Us
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.