AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी : अखेर प्रतीक्षा संपली, राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले, निवडणुका जाहीर

राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले असून निवडणूक होणाऱ्या ठिकाणी आजपासूनच आचार संहिता जारी करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रमही जाहीर केला आहे.

मोठी बातमी : अखेर प्रतीक्षा संपली, राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले, निवडणुका जाहीर
ELECTION COMMISION Image Credit source: TV9 NETWORK
| Updated on: Apr 06, 2023 | 7:51 PM
Share

मुंबई : राज्यात बहुचर्चित असलेल्या निवडणुकांची प्रतीक्षा आता संपली आहे. राज्यसभा, विधान परिषद आणि विधानसभा पोटनिवडणुका झाल्या. त्यामुळे राज्यात आणखी काही रिक्त असलेल्या जागांसाठी निवडणूक कधी जाहीर होणार याचीच उत्सुकता लागून राहिली होती. अखेर निवडणूक आयोगाने या निवडणूक जाहीर केल्या आहेत. त्यामुळे राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले असून निवडणूक होणाऱ्या ठिकाणी आजपासूनच आचार संहिता जारी करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रमही जाहीर केला आहे.

राज्यातील विविध ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवडणुका होणार आहेत. यासाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे.

सदस्याचे निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र 25 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत दाखल करता येणार आहेत. मात्र, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत.

उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी 3 मे 2023 रोजी होईल. 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होऊन 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 19 मे 2023 रोजी होणार आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...