AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकल सुरू केल्यास फ्लॅटफार्मवरील गर्दी घातक ठरेल; मध्य रेल्वेचा राज्य सरकारला इशारा

लोकल सुरू करण्याबाबत मध्य रेल्वेनेही राज्य सरकारला पत्रं लिहून काही मुद्द्यांकडे सरकारचं लक्ष वेधल्याचं मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी सांगितलं.

लोकल सुरू केल्यास फ्लॅटफार्मवरील गर्दी घातक ठरेल; मध्य रेल्वेचा राज्य सरकारला इशारा
| Updated on: Oct 29, 2020 | 3:34 PM
Share

मुंबई: सर्वसामान्यांनाही लोकलच्या प्रवासाची परवानगी द्यावी म्हणून राज्य सरकारने रेल्वेकडे मागणी केली असून त्याला मध्य रेल्वेकडून उत्तर आलं आहे. लोकल सुरू केल्यास सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं कठिण होणार आहे. त्याशिाय लोकल सुरू केल्यास रेल्वे फलाटावर होणारी गर्दी घातक ठरेल, असा धोक्याचा इशारा मध्य रेल्वेने राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात दिला आहे. (central railway wrote maharashtra government to Reopen Mumbai local)

लोकल सुरू करण्याबाबत मध्य रेल्वेनेही राज्य सरकारला पत्रं लिहून काही मुद्द्यांकडे सरकारचं लक्ष वेधल्याचं मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी सांगितलं. या पत्रात मध्य रेल्वेने अडचणींचा पाढाच वाचला आहे. लोकल सुरू केल्यास सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं हे आव्हानच ठरणार आहे. सर्वांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी प्रवासाची रुपरेखा ठरवावी लागणार असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. मध्य रेल्वेत लोकलच्या 1774 फेऱ्या करण्यात येत होत्या. कोरोना काळात आता या फेऱ्या 706 एवढ्या करण्यात आल्या आहेत. कोरोनापूर्वी दिवसाला 45 लाख प्रवासी प्रवास करत होते. एका ट्रेनमध्ये एका फेरीत साधारण 2,500 प्रवासी प्रवास करायचे. कोरोना काळात आता 700 प्रवासी प्रवास करत असून दिवसाला रोज 4 ते 5 लाक प्रवासी प्रवास करत असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरू केल्यास रेल्वे फ्लॅटफार्मवरील होणारी गर्दी घातक ठरेल, असं रेल्वेने या पत्रात नमूद केल्याचं सूत्रांनी सांगितलं. कोरोनापूर्वी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 35 ते 40 लाख प्रवासी प्रवास करायचे. सर्व लाइनवर एकूण 80 लाख प्रवासी प्रवास करायचे. यातील 50 टक्के प्रवाशांनाही प्रवासाची परवानगी दिली तर सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल का? हा मोठा प्रश्न असल्याचा सवालही या पत्रातून करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. रेल्वेतील गर्दी टाळण्यासाठी सरकारी आणि खासगी कार्यालयातील कामाच्या वेळा बदलण्याची सूचनाही रेल्वेने पत्रातून केल्याचं समजतं. (central railway wrote maharashtra government to Reopen Mumbai local)

संबंधित बातम्या:

लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत सरकारच्या हालचाली, ठाकरे सरकार मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट देणार?

दिवाळीला गावी जाताय? मग एसटीनेच जा!, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीकडून हंगामी दरवाढ रद्द

(central railway wrote maharashtra government to Reopen Mumbai local)

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.