AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ निर्णयामुळे महायुतीचं टेन्शन वाढलं? घडामोडींना वेग

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी राज्यात कोणाचं सरकार येणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या 'त्या' निर्णयामुळे महायुतीचं टेन्शन वाढलं? घडामोडींना वेग
| Updated on: Nov 10, 2024 | 6:32 PM
Share

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी राज्यात कोणाचं सरकार येणार? कोणाच्या बाजुनं मतदार कौल देणार याची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुंतागुतीची राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन बड्या पक्षात पडलेल्या फुटीनंतर ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये या निवडणुकीत अनेकांनी बंडखोरी केल्याचं पहायला मिळालं. आधीच या बंडखोरांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. आता त्यात भरीसभर म्हणजे अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली एकाच गटातील दोन पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात देखील ही स्थिती आहे.  श्रीरामपूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लहू कानडे हे उमेदवार आहेत तर त्याच मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून देखील उमेदवार देण्यात आला आहे.  शिवसेना शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे लहू कानडे हेच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केलं आहे.

मात्र असं असताना देखील आता या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी जाहीर सभा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.   शिवसेनेचे राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी एकनाथ शिंदेंच्या या होणाऱ्या सभेबाबत माहिती दिली आहे. परंतु यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून या मतदारसंघात मैत्रिपूर्ण लढत होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

नेमकं काय म्हटलं विखे पाटील यांनी? 

भाऊसाहेब कांबळे यांचा अर्ज मागे घेऊ, असे मला स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मी त्याबद्दल भाऊसाहेब कांबळे यांना सांगितले होते. मात्र नंतर काय झाले माहीत नाही. अर्ज माघारीच्या दिवशी ते नॉटरिचेबल झाले. भाऊसाहेब कांबळे उभे राहणार असतील तर महायुतीच्या दोन उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल. मात्र जागा राष्ट्रवादीला सोडल्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला कळवण्यात आले होते. त्यामुळे कानडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे मी जाहीर केले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना वाटतं असेल की भाऊसाहेब कांबळे हेच त्यांचे उमेदवार आहेत. तर शेवटी मुख्यमंत्री राज्याचे नेते आहेत. त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे महायुतीला फटका बसेल असं मला वाटत नाही,  दोन उमेदवार असले तरी जनता महायुती सोबत आहे, असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.