AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ निर्णयामुळे महायुतीचं टेन्शन वाढलं? घडामोडींना वेग

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी राज्यात कोणाचं सरकार येणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या 'त्या' निर्णयामुळे महायुतीचं टेन्शन वाढलं? घडामोडींना वेग
| Updated on: Nov 10, 2024 | 6:32 PM
Share

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी राज्यात कोणाचं सरकार येणार? कोणाच्या बाजुनं मतदार कौल देणार याची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुंतागुतीची राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन बड्या पक्षात पडलेल्या फुटीनंतर ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये या निवडणुकीत अनेकांनी बंडखोरी केल्याचं पहायला मिळालं. आधीच या बंडखोरांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. आता त्यात भरीसभर म्हणजे अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली एकाच गटातील दोन पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात देखील ही स्थिती आहे.  श्रीरामपूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लहू कानडे हे उमेदवार आहेत तर त्याच मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून देखील उमेदवार देण्यात आला आहे.  शिवसेना शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे लहू कानडे हेच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केलं आहे.

मात्र असं असताना देखील आता या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी जाहीर सभा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.   शिवसेनेचे राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी एकनाथ शिंदेंच्या या होणाऱ्या सभेबाबत माहिती दिली आहे. परंतु यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून या मतदारसंघात मैत्रिपूर्ण लढत होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

नेमकं काय म्हटलं विखे पाटील यांनी? 

भाऊसाहेब कांबळे यांचा अर्ज मागे घेऊ, असे मला स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मी त्याबद्दल भाऊसाहेब कांबळे यांना सांगितले होते. मात्र नंतर काय झाले माहीत नाही. अर्ज माघारीच्या दिवशी ते नॉटरिचेबल झाले. भाऊसाहेब कांबळे उभे राहणार असतील तर महायुतीच्या दोन उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल. मात्र जागा राष्ट्रवादीला सोडल्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला कळवण्यात आले होते. त्यामुळे कानडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे मी जाहीर केले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना वाटतं असेल की भाऊसाहेब कांबळे हेच त्यांचे उमेदवार आहेत. तर शेवटी मुख्यमंत्री राज्याचे नेते आहेत. त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे महायुतीला फटका बसेल असं मला वाटत नाही,  दोन उमेदवार असले तरी जनता महायुती सोबत आहे, असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.