AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप निश्चित? देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवरील घडामोडींवर भाष्य करताना मोठा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप तर घडून येणार नाही ना? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप निश्चित? देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसImage Credit source: TV9MARATHI
| Edited By: | Updated on: Mar 27, 2024 | 5:08 PM
Share

ठाकरे गटाकडून आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 17 जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. पण यापैकी सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन जागांवर जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या दोन्ही जागांवर काँग्रेसचा दावा होता. विशेष म्हणजे सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम हे दिल्ली पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी गेले आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच राहावी, अशी विनंती विश्वजीत कदम यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

ठाकरे गटाकडून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी डबल महाराष्ट्र केसरी विजेते चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झालीय. या जागेवरुन काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी आक्षेप घेत ते आक्रमक झाले आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीसोबत न जाता एकला चलोचा नारा दिला आहे. या घडामोडी पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडीतून अनेक लोकं बाहेर पडतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

‘अनेक लोकं महाविकास आघाडीतून बाहेर पडलीत’, फडणवीसांची भविष्यवाणी

“महाविकास आघाडीमध्ये कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. सगळे एकमेकांच्या सीटवर उमेदवार घोषित करत आहेत, अशी परिस्थिती आहे. अनेक लोकं महाविकास आघाडीतून बाहेर पडलीत. वंचित आणि महाविकास आघाडीत काय झालं? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या संदर्भात मला काहीही बोलायचं नाही, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली.

फडणवीसांचा ठाकरेंना टोला

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या घडामोडींवरुन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. “असं आहे की सन्माननीय उद्धव ठाकरेंचा अनुभव खूप वर्ष घेतलेला आहे. आम्हाला याची सवय आहे. काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर त्यांनाही सवय करून घ्यावी लागेल. कारण ते असचं वागतात”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

अखेर भाजपचा गटनेता ठरला! गणेश खणकरांची वर्णी
अखेर भाजपचा गटनेता ठरला! गणेश खणकरांची वर्णी.
... म्हणून हा कट शिजला, अन् ठिणगी पडली! विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
... म्हणून हा कट शिजला, अन् ठिणगी पडली! विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप.
अजितदादांनी भाजपच्या फाईलवर भाष्य केलं अन् 10 दिवसाने अपघात झाला...
अजितदादांनी भाजपच्या फाईलवर भाष्य केलं अन् 10 दिवसाने अपघात झाला....
सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळावर पोहोचल्या
सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळावर पोहोचल्या.
कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.
त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं.
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!.
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?.
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?.
विलीनीकरणच विलीन? दादांचे नेते काय बोलून गेले?
विलीनीकरणच विलीन? दादांचे नेते काय बोलून गेले?.