AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadanvis : ‘बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी’.. अण्णामलाईंच्या त्या विधानावर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी सोडलं मौन, काय म्हणाले फडणवीस ?

Bombay is not Maharashtra City : मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी भाषा, मराठी संस्कृती यावरून वातावरण तापलेलं दिसत आहे. मराठी वाचवा असा नारा ठाकरे बंधूंनी दिला. त्यातच अण्णा मलाई यांच्या विधानामुळे नवा राजकीय वाद पेटला असून विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं. टीव्ही9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करत हे विधान गांभीर्याने न घ्यायचा सल्ला दिला.

Devendra Fadanvis : 'बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी'.. अण्णामलाईंच्या त्या विधानावर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी सोडलं मौन, काय म्हणाले फडणवीस ?
देवेंद्र फडणवीसImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jan 12, 2026 | 11:20 AM
Share

मुंबई महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला असून मराठी महापौर हवा. मराठी वाचवा असा नारा देत अनेक राजकीय पक्षांनी मराठीचा कैवार घेण्याची भूमिका अंगिकारली आहे. बीएमसी निवडणुकीत भाजपचे विविध स्टार प्रचारक उतरले असून उत्तर प्रदेश, बिहारमधील भाजपचे नेते आणि स्टारही इथे प्रचारासाठी आलेले दिसले. याच दरम्यान दक्षिण भारतातील भाषिकांसाठी तामिळनाडूतील भाजप नेते के अण्णामलाई हेदेखील प्रचारासठी मुंबईत आले होते. मात्र त्यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानावरून अख्खं रान पेटलं आहे. त्यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला. एवढंच नव्हे तर त्यावर कडी करत त्यांनी ‘बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी ‘ असं विधान केल्याने विरोधकांच्या हाती चांगलंच कोलीत मिळालं.

यावरून राज्यात मोठा वाद पेटलेला दिसला. विरोधकांनी तर भाजपच्या या नेत्याचा जोरदार विरोध करत त्याच्यावर टीकास्त्र सोडलं. या सर्व मुद्यावर भाजपची भूमिका मात्र अद्याप समोर आली नव्हती. मात्र आता टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अण्णामलाई यांचं विधान, त्यावरून झालेला वाद या सर्व मुद्यां वर स्पष्ट भाष्य केलं आहे. त्यावर एवढं लक्ष देऊ नका, असंही ते म्हणाले. टीव्ही9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेत त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला.

अण्णा मलाईंवर काय म्हणाले मुख्यमंत्री ?

मुळात अण्णा मलाई हे काही राष्ट्रीय नेते नाही. ते तामिळ लोकांच्या आग्रहाखातर इथे महाराष्ट्रात, मुंबईत प्रचारासाठी आले, ते नीट हिंदी बोलत नाही. आता मी जेव्हा तामिळनाडूला गेलो होते, तेव्हा बोलता बोलता आधी मद्रास म्हणालो. नंतर त्या लोकांनी लक्षात आणून दिलं म्हणून मी दुरुस्त करत चेन्नई असा उल्लेख केला. खरंतर आपली बोलण्याची एक सवय असते. त्यामुळे अण्णा मलाई यांच्या विधानावर एवढं लक्ष देऊ नका असं मुख्यमंत्री म्हणाले.

बॉम्बेचं मुंबई करणारे तुम्ही नाही, ते राम नाईक आहेत. तुमचा सपोर्ट आहेत. अण्णामलाई काही पंतप्रधानच आहेत, अशा पद्धतीने तुम्ही घेऊ नका. बॉम्बेचं मुंबई करण्याचं श्रेय आमचंच आहे. हे लोक बाळबोध आहे. जर बॉम्बेचं मुंबई करणारे आम्ही आहोत. तर मुंबईचं बॉम्बे करून आम्हाला काय मिळणार आहे? कोण आम्हाला समर्थन देणार ? आमचे मतदार किंवा पक्षातील लोकही समर्थन करणार का ? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला. बोलायला काही विषय नसतात तेव्हा हे विषय घेतले जातात, असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी हाणला.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं