AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhiwandiwala Trust: भिवंडीतील ट्रस्टची 22 एकर जमीन खरेदी प्रकरण; आमदार महेश बालदी यांची चौकशी होणार?; काय आहे प्रकरण?

maha vikas aghadi: महाविकास आघाडीतील आमदारांवर ईडी, आयकर आणि सीबीआयच्या धाडी सुरू असतानाच आता भाजपचे (bjp) आमदारही गोत्यात आले आहेत. खान बहादूर होरमसजी मानेकजी भिवंडीवाला ट्रस्टची जमीन काही सदस्यांनी विकल्याचं प्रकरण उघड झालं आहे.

Bhiwandiwala Trust: भिवंडीतील ट्रस्टची 22 एकर जमीन खरेदी प्रकरण; आमदार महेश बालदी यांची चौकशी होणार?; काय आहे प्रकरण?
भिवंडीतील ट्रस्टची 22 एकर जमीन खरेदी प्रकरण; आमदार महेश बालदी यांची चौकशी होणार?Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 12:50 PM
Share

नवी मुंबई: महाविकास आघाडीतील (maha vikas aghadi) आमदारांवर ईडी, आयकर आणि सीबीआयच्या धाडी सुरू असतानाच आता भाजपचे (bjp) आमदारही गोत्यात आले आहेत. खान बहादूर होरमसजी मानेकजी भिवंडीवाला ट्रस्टची जमीन काही सदस्यांनी विकल्याचं प्रकरण उघड झालं आहे. या सदस्यांनी जमिनीच्या नोंदीवरून ट्रस्टचं नाव काढून टाकलं आणि ही जमीन विकली. त्यामुळे ट्रस्टचे 80 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी ट्रस्टच्या सदस्यांविरोधात एलटी मार्ग पोलीस (LTmarg police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे उरणचे भाजपचे आमदार महेश बालदी यांनी यातील सुमारे 22 एकर जमीन ट्रस्टच्या सदस्यांकडून खरेदी केली होती. त्यामुळे बालदी यांचीही या प्रकरणी चौकशी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे भाजप आमदार महेश बालदी यांच्या अडचणीत वाढ होणार आहेत.

नवी मुंबई परिसरात आणि खासकरून सिडकोच्या क्षेत्रात खान बहादूर होरमसजी मानेकजी भिवंडीवाला ट्रस्टची मोठ्या प्रमाणावर जमीन आहे. या ट्रस्टच्या एका सदस्याने ट्रस्टच्या जमिनीच्या नोंदीवरून ट्रस्टचे नावच काढून टाकले. त्यानंतर त्याने या जागेच्या मोबदल्यात सिडकोकडे साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंडाची मागणी केली होती. नंतर त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे ट्रस्टची जमीन विकली. त्यामुळे ट्रस्टला 80 कोटी रुपयांचे नुकसान झाले. नवी मुंबईसह इतर ठिकाणच्या अनेक बिल्डरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जमीन खरेदी केली. त्यात भाजपचे उरणचे आमदार महेश बालदी यांचाही समावेश आहे. बालदी यांनी जवळपास 22 एकर जमीन खरेदी केल्याचं दैनिक ‘सामना’च्या वृत्तात म्हटलं आहे.

बालदींकडून कितीचा व्यवहार?

महेश बालदी यांनी 2018मध्ये ही जमीन खरेदी केली होती. बालदी यांनी ट्रस्टच्या सदस्याकडून 22 एकर जमीन 16 कोटी 45 लाख रुपयांना खरेदी केली होती. बनावट कागदपत्रांच्या आधारे बालदी यांना ही जमीन विकण्यात आली होती. हे सर्व व्यवहार बेकायदा असल्याने या प्रकरणी एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रस्टच्या प्रतिनिधी फरिदा दुबाश यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून या खरेदी व्यवहाराबाबत बालदी यांचीही चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, याबाबत बालदी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.

संबंधित बातम्या:

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या ‘हिंदुत्ववादी भोंग्या’ची पुण्यातल्या प्रमुख शिलेदारालाच धास्ती, वसंत मोरे राजकीय धक्क्यात

Sanjay Raut on Bhagat Singh Koshyari: आम्ही संघर्ष करत नाही, त्यांनाच खाजवायची सवय पडलीय; राऊतांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Maharashtra News Live Update : नवी दिल्ली शिवसेना खासदारांच्या बैठकीत नाराजी

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.