AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुरमई 800, तर कोळंबी 500 रुपये किलो, चक्रीवादळामुळे मासे महागले

मुंबईसह उपनगरात माशांच्या आवक घटली असून माशांच्या किंमतीतही 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे मुंबईमध्ये मासे खाणाऱ्या खवय्यांच्या तोंडचे पाणी पळाले (Fish Rate increase in market) आहे.

सुरमई 800, तर कोळंबी 500 रुपये किलो, चक्रीवादळामुळे मासे महागले
| Edited By: | Updated on: Nov 10, 2019 | 4:51 PM
Share

ठाणे : अरबी समुद्रात सातत्याने निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे मासेमारीवर बंदी घालण्यात आली (Fish Rate increase in market) आहे. त्यामुळे कुलाबा, पालघर, डहाणू, वसई यासारख्या भागांमध्ये समुद्रात मासेमारीवर बंदी घाल्याने याचा तुटवडा जाणवू लागला आहे. विशेष म्हणजे मुंबईसह उपनगरात माशांच्या आवक घटली असून माशांच्या किंमतीतही 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे मुंबईमध्ये मासे खाणाऱ्या खवय्यांच्या तोंडचे पाणी पळाले (Fish Rate increase in market) आहे.

मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टीवर ऑगस्ट महिन्यापासून मासेमारीचा हंगाम सुरु होतो. त्यानतंर ऑक्टोबरपासून चांगल्या प्रकारचे मासे मिळायला सुरुवात होते. मात्र क्यार, महा या दोन्ही अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा फटका मासे उत्पादनाला बसला आहे. मुंबईतील कुलाबा आणि भाऊच्या धक्का या दोन ठिकाणाहून मुंबई उपनगर, ठाणे या ठिकाणी माशांची आवक होते.

मात्र गेल्या काही दिवसांपासून मासेमारी बंद असल्याचे माशांच्या पुरवठ्यात घट झाली आहे. त्यामुळे माशांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. हिवाळ्यात माशांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. सद्य: स्थितीत बाजारात माशांची आवक होत नसल्याने त्याच्या किमतीत वाढ झाल्याचे मासळी विक्रेत्यांनी सांगितले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आसपासच्या परिसरात माशांची आवक घटल्याने माशांच्या किमतीत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर पुरवठ्यात 60 ते 70 टक्क्यांनी घट झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणं (Fish Rate increase in market) आहे.

ऑक्टोबर महिन्यात जवळपास 150 रुपये किलो या दराने मिळणारे बोंबिल सध्या 200 रुपये किलोने मिळत आहेत. तर 400 रुपये किलोने मिळणारी कोळंबी सध्या 500 रुपये किलोने मिळत आहे. पापलेटच्या किमतीतही वाढ झाली असून पापलेट आकारानुसार 600 ते 1200 रुपये किलोने मिळत होते. मात्र आता 800 ते 1500 रुपये किलोने मिळत आहेत. तसेच 550 रुपये किलोने मिळणारी सुरमई सध्या 800 रुपये किलोने मिळत आहेत.

त्यामुळे माशांच्या किमतीत प्रति किलोमागे 100 ते 300 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे मासे खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. गेल्या काही काळात जिताडा माशालाही खवय्यांकडून मोठी मागणी असते. उत्तम प्रतीच्या जिताडय़ाचे दरही किलोमागे 1 हजार ते 1200 रुपयांपर्यत पोहोचले आहेत.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...