AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूल, रस्ते गेले, 36 लाख हेक्टरवरील पीक पाण्यात, मराठवाड्यात तब्बल 4 हजार कोटींचं नुकसान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टीमुळे नेमके किती नुकसान झाले याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी मराठवाड्यातील 48 लाख हेक्टर पैकी 35 ते 36 लाख हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याची शक्यता आहे. एनडीआरएफच्या नॉर्मनुसार हे नुकसान 4 हजार कोटी रुपयांचे असावे, असं सांगितलं आहे.

पूल, रस्ते गेले, 36 लाख हेक्टरवरील पीक पाण्यात, मराठवाड्यात तब्बल 4 हजार कोटींचं नुकसान
हरियाणातील सुमारे 70 टक्के लोक शेतीशी संबंधित आहेत. देशात हरित क्रांती आणण्यात हरियाणाने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगितले जाते. येथे गहू, तांदूळ, ऊस, सूर्यफूल इत्यादी पिकांची लागवड केली जाते. सूर्यफूल लागवडीमध्ये देशात हरियाणा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर हे राज्य पशुपालनातही पुढे आहे.
| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 10:24 AM
Share

औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्याची मोठी दुर्दशा झाली. या भागात खरीप हंगाम पुरता पाण्यात गेला. अतिवृष्टी झाल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते तसेच काही मंत्र्यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टीमुळे नेमके किती नुकसान झाले याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी मराठवाड्यातील 48 लाख हेक्टर पैकी 35 ते 36 लाख हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याची शक्यता आहे. एनडीआरएफच्या नॉर्मनुसार हे नुकसान 4 हजार कोटी रुपयांचे असावे, असं सांगितलं आहे.

ओल्या दुष्काळाचा निर्णय मुख्यमंत्री स्तरावर

अजित पवार यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टी तसेच झालेल्या नुकसानीविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच वेळ आली तर कर्ज काढू पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन दिले. “मराठवाड्यातील 48 लाख हेक्टर क्षैत्रापैकी 35 ते 36 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. एनडीआरएफच्या नॉर्मनुसार हे नुकसान 4 हजार कोटी रुपयांचे झाले असावे. पालकमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. ओल्या दुष्काळाचा निर्णय मुख्यमंत्री स्तरावर होईल. मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलणार आहे. वेळप्रसंगी कर्ज काढू. पण मराठवाड्याच्या आणि राज्यातील कुठल्याच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

19 तारखेपर्यंत आणखी पावसाचा अंदाज

तसेच मराठवाड्यात 32 ते 36 लाख हेक्टरवर नुकसान झाल्याच्या प्राथमिक आकडा येतोय. एनडीआरएफच्या नॉर्मप्रमाणे 4 हजार कोटींचे नुकसान झाल्याचे दिसतेय. बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. 19 तारखेपर्यंत अजून पावसाचा अंदाज आहे. एनडीआरएफच्या नॉर्मनुसार काम सुरु आहे. मुखमंत्र्यांना सोमवारी याबाबत आम्ही अहवाल देणार आहेत. तसेच नुकसानीविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत, असेदेखील अजित पवार म्हणाले.

पॅकेज जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार 

तसेच पुढे बोलताना, रस्ते पूल सगळं वाहून गेलं. तलाव फुटले आहेत. नुकसानीचा पूर्ण अंदाज अजून आलेला नाही. मात्र, यंत्रणा काम करत आहे. यापूर्वी पीक विम्याचे पैसे आम्ही सोडलेले आहेत. आता केंद्रानेही पैसे द्यावेत. नुकसान झालेले शेतकरी तसेच इतर घटकांना मदत करण्यासंदर्भात पॅकेज जाहीर करण्याबाबत आम्ही चर्चा करणार आहेत. यावर मुख्यमंत्री स्तरावर निर्णय होईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

महाराष्ट्र बंदला पाठिंबा

तसे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना पीककर्ज फेडणे शक्य नाही. त्यामुळे कर्जाचे पुनर्गठन करावे लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत सविस्तर सांगतील, असेदेखील पवार म्हणाले. तसेच सोमवारच्या महाराष्ट्र बंदला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांना चिरडणे याआधी कधीच घडलं नाही, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.

इतर बातम्या :

आयकर विभागानं पवार कुटुंबियांना टार्गेट केलंय का? फडणवीसांची पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया

मोठी बातमी! एनसीबीनं ड्रग्जकांडात सोडलेल्यांमध्ये एकजण राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाच्या जवळचा, फडणवीसांचा गौप्यस्फोट

Rain Update | पुण्यात पावसामुळे दाणादाण, सखल भागात पाणी साचलं, आगामी 4 दिवसांत राज्यात मुसळधार

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.