AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदी सक्तीचा जीआर रद्द होताच मनसेची पहिली प्रतिक्रिया काय? नेमकी भूमिका काय?

राज्य सरकारने हिंदी भाषा लागू करण्याबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. त्यानंतर आता मनसेने आपली भूमिका जाहीर केली आहे.

हिंदी सक्तीचा जीआर रद्द होताच मनसेची पहिली प्रतिक्रिया काय? नेमकी भूमिका काय?
Raj Thackeray
| Updated on: Jun 29, 2025 | 8:21 PM
Share

राज्य सरकारने हिंदी भाषा लागू करण्याबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. त्रिभाषा सूत्राअंतर्गत राज्य सरकारने तिसरी भाषा म्हणून इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता हा निर्णय रद्द केल्यानंतर सरकारने एका समितीची स्थापना केली आहे. या समितीअंतर्गत तिसरी भाषा म्हणून कोणती भाषा लागू करावी? यावर अभ्यास केला जाणार आहे. दरम्यान, या निर्णयानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठी माणूस एकत्र आला तर काय होऊ शतकं, याचा संदेश देशात गेला आहे, असे देशपांडे म्हणाले.

संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले ?

मराठी माणसाचा विजय आहे. मराठी माणसाच्या दबावापुढे सरकार झुकलं आहे. मराठी माणूस एकत्र आला तर काय होऊ शकतं. हा संदेश जायचा होता तो देशात गेला आहे. आताच्या सरकारने जीआर काढला होता. तो रद्द करणं गरजेचं होतं. मराठी माणसाच्या एकजुटीने हा रद्द झाला आहे. राज ठाकरेंनी या सर्व गोष्टी देशासमोर मराठी माणसासमोर ठेवल्या. मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय झाला आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले.

सरकारने नेमका काय निर्णय घेतला?

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी त्रिभाषा सूत्राअंर्गत तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला होता. इयत्ता पाहिलीपासूनच ही भाषा शिकवली जाणार होती. विरोधकांनी सरकारच्या याच धोरणाला विरोध केला होता. काहीही झालं तरी आम्ही हिंदीची सक्ती होऊ देणार नाही, असी भूमिका मनसे, ठाकरे गट, काँग्रेस तसेच इतर पक्षांनी घेतली होती. त्यानंतर आता हा विरोध पाहता सरकारने जारी केलेले दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. तसेच डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या इतर सदस्यांची नावे लवकरच जाहीर केले जाणार आहेत. तसेच या समितीच्या अहवालानंतर त्रिभाषाबाबत नेमकं काय करायचं? कोणती भाषा लागू करायची, हे ठरवले जाणार आहे.

दरम्यान, पाच जुलै रोजी मनसे, ठाकरे गट तसेच इतर पक्षांचा मोर्चा होणार होता. हा मोर्चा आता होणार आहे. पण त्याचे स्वरुप दुसरे असेल. ही विजयी सभा असेल असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यानंतर आता मनसे या सभेत सहभागी होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठऱणार आहे.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!