AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD weather update : पुढील 24 तासांमध्ये पावसाचं रौद्र रूप, 26 राज्यांना हाय अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा

पुन्हा एकदा पावसासाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती होत आहे. पुढील 24 तासांसाठी 26 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, या काळात प्रति तास 90 किमी वेगाने वारे वाहन्याची देखील शक्यता आहे.

IMD weather update : पुढील 24 तासांमध्ये पावसाचं रौद्र रूप, 26 राज्यांना हाय अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा
IMD weather updateImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 29, 2026 | 6:40 PM
Share

राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे, पावसामध्ये मोठा खंड पडल्याने पिकं संकटात सापडली असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परंतु आता पावसासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होत असल्याचं पहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाकडून पुढील 24 तासांसाठी 26 राज्यांना अतिमुसळधार पावसाचा हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान याच काळात तब्बल 90 किलोमीटर प्रती तास वेगानं वारं देखील वाहणार आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सतर्कतेचं आवाहन केलं आहे. तसेच काही भागांमध्ये भूस्खलनाच्या घटना देखील घडू शकतात, अशा इशाराही देण्यात आला आहे.

या राज्यांना पावसाचा इशारा

हवामान विभागाकडून उद्या 30 ऑगस्ट रोजी तब्बल 26 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात 90 किलोमीटर प्रतितास वेगाने वारं वाहण्याची शक्यता आहे. अनेक भागांमध्ये विजांचा कडकडाट, आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, जम्मू -काश्मीर, लडाख, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, महाराष्ट्र, आसाम, त्रिपुरा, नागालँड, सिक्कीम, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या रांज्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पाऊस झाल्यास त्याचा फायदा हा पिकांना होणार आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

दरम्यान महाराष्ट्रात देखील पावसासाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती होत आहे. पुढील 24 तासांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणातील काही भाग, तसेच मध्य महाराष्ट्रात काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे. राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे पिकं संकटात सापडली आहेत. या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळू शकते. राज्यात जुलै महिन्याच्या पहिला आठवड्यात आणि तिसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस झाला होता, मात्र त्यांनंतर पावसाने दडी मारली आहे.  परंतु आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे.

Follow Us
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; राऊतांना...
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; बड्या नेत्याचा राऊतांना इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी, पहा खास क्षणाचा व्हिडीओ
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात...नेमकं प्रकरण काय?
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात... नेमकं प्रकरण काय?
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं ठरणार
वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
छत्रपती संभाजीनगर: वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; विद्यार्थ्यांचा...
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; आदिवासी विद्यार्थ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द,
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द, अचानक काय घडलं?
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितलं...
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितला मोठा प्लॅन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल, फडणवीसांनी केलं स्वागत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्वागत