AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिया आघाडीचा केंद्राला घाम फोडणारा निर्णय, आता थेट एल्गारच; उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींच्या सीक्रेट मिटिंगमध्ये काय ठरलं?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर मतदानात गोंधळ घातल्याचा गंभीर आरोप केला आहे. इंडिया आघाडीची दिल्लीत झालेली बैठक आणि राहुल गांधी-उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र चर्चा यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ११ ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीतर्फे निवडणूक आयोगविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

इंडिया आघाडीचा केंद्राला घाम फोडणारा निर्णय, आता थेट एल्गारच; उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींच्या सीक्रेट मिटिंगमध्ये काय ठरलं?
उद्धव ठाकरे-राहुल गांधीImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Aug 09, 2025 | 10:43 AM
Share

निवडणूक आयोग आणि भाजपने मिळून मतं चोरल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वीच केला होता. पत्रकार परिषद घेत त्यांनी मोठा बॉम्ब टाकला असून हा मुद्दा आता चांगलाच पेटला आहे. गेल्या आठवड्यात इंडिया आघाडीचीही बैठक दिल्लीत पार पडली. राहुल गांधी आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र बैठक होऊनही चर्चा झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाविरोधातील लढा तीव्र करण्याच निर्णय घेण्यात आला असून अवघ्या दोन दिवसांनी म्हणजे सोमवार, 11 ऑगस्ट रोजी इंडिया आघआडीतर्फे निवडणूक आयोगविरोधात मोर्चा काढत एल्गार पुकारण्यात येणार आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आज माध्यमांशी संवाद साधताना या विषायवर बोलत बरेच खुलासे केले. उद्धव ठाकरे व राहुल गांधींच्या बैठकीत नेमकं काय घडलं, काय ठरलं, हेही त्यांनी सांगितलं. निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरोधात लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय या दोन्ही नेत्यांच्या भेटीत ठरल्याचं राऊत म्हणाले.

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचे घोटाळा बाहेर काढण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मेंदूतील जी चीप आहे, ती डिस्टर्ब झाली आहे. आमची डोक्यातील चीप बरोबर आहे. 11 तारखेला निवडणूक आयोगवर सर्वपक्षीयं मोर्चा (इंडिया ब्लॉक) हे काढण्याचं नक्की झालं आहे. आणि शिवसेनेचे सर्व खासदार त्या मोर्चामध्ये सहभागी होतील. सगळ्याच पक्षांचे खासदार, प्रमुख पदाधिकारी हे त्या मोर्चामध्ये सहभागी होतील हे ठरलं आहे, असं राऊत म्हणाले.

35 मिनिटांच्या बैठकीत काय झाली चर्चा ?

उद्धव ठाकरे हे तीन दिवनस दिल्लीत मुक्कामी होते, त्यांना राहुल गांधींनी आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार उद्धव ठाकरे आले, राहुल गांधींनी निवासस्थानी, स्पेशल स्क्रीन लावून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यासंदर्भातील स्पेशल प्रेझेंटेशन दाखवलं तिथे.  आम्ही ते नीट पाहिलं, समजून घेतलं.  त्यानंतर भोजन व नंतर राहुल गांधी यांच्या निवासस्थानी मोजक्या लोकांची एक बैठक झाली. त्यावेळेस राहुल गांधी, खर्गे,  उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, इतर प्रमुख नेते उपस्थित होतो. त्या बैठकीत राजकारणाची पुढील रूपरेषा ठरली, अनेक विषयांवर चर्चा झाली, असं राऊत म्हणाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.