AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिया आघाडीचा केंद्राला घाम फोडणारा निर्णय, आता थेट एल्गारच; उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींच्या सीक्रेट मिटिंगमध्ये काय ठरलं?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर मतदानात गोंधळ घातल्याचा गंभीर आरोप केला आहे. इंडिया आघाडीची दिल्लीत झालेली बैठक आणि राहुल गांधी-उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र चर्चा यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ११ ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीतर्फे निवडणूक आयोगविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

इंडिया आघाडीचा केंद्राला घाम फोडणारा निर्णय, आता थेट एल्गारच; उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींच्या सीक्रेट मिटिंगमध्ये काय ठरलं?
उद्धव ठाकरे-राहुल गांधीImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Aug 09, 2025 | 10:43 AM
Share

निवडणूक आयोग आणि भाजपने मिळून मतं चोरल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वीच केला होता. पत्रकार परिषद घेत त्यांनी मोठा बॉम्ब टाकला असून हा मुद्दा आता चांगलाच पेटला आहे. गेल्या आठवड्यात इंडिया आघाडीचीही बैठक दिल्लीत पार पडली. राहुल गांधी आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र बैठक होऊनही चर्चा झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाविरोधातील लढा तीव्र करण्याच निर्णय घेण्यात आला असून अवघ्या दोन दिवसांनी म्हणजे सोमवार, 11 ऑगस्ट रोजी इंडिया आघआडीतर्फे निवडणूक आयोगविरोधात मोर्चा काढत एल्गार पुकारण्यात येणार आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आज माध्यमांशी संवाद साधताना या विषायवर बोलत बरेच खुलासे केले. उद्धव ठाकरे व राहुल गांधींच्या बैठकीत नेमकं काय घडलं, काय ठरलं, हेही त्यांनी सांगितलं. निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरोधात लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय या दोन्ही नेत्यांच्या भेटीत ठरल्याचं राऊत म्हणाले.

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचे घोटाळा बाहेर काढण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मेंदूतील जी चीप आहे, ती डिस्टर्ब झाली आहे. आमची डोक्यातील चीप बरोबर आहे. 11 तारखेला निवडणूक आयोगवर सर्वपक्षीयं मोर्चा (इंडिया ब्लॉक) हे काढण्याचं नक्की झालं आहे. आणि शिवसेनेचे सर्व खासदार त्या मोर्चामध्ये सहभागी होतील. सगळ्याच पक्षांचे खासदार, प्रमुख पदाधिकारी हे त्या मोर्चामध्ये सहभागी होतील हे ठरलं आहे, असं राऊत म्हणाले.

35 मिनिटांच्या बैठकीत काय झाली चर्चा ?

उद्धव ठाकरे हे तीन दिवनस दिल्लीत मुक्कामी होते, त्यांना राहुल गांधींनी आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार उद्धव ठाकरे आले, राहुल गांधींनी निवासस्थानी, स्पेशल स्क्रीन लावून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यासंदर्भातील स्पेशल प्रेझेंटेशन दाखवलं तिथे.  आम्ही ते नीट पाहिलं, समजून घेतलं.  त्यानंतर भोजन व नंतर राहुल गांधी यांच्या निवासस्थानी मोजक्या लोकांची एक बैठक झाली. त्यावेळेस राहुल गांधी, खर्गे,  उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, इतर प्रमुख नेते उपस्थित होतो. त्या बैठकीत राजकारणाची पुढील रूपरेषा ठरली, अनेक विषयांवर चर्चा झाली, असं राऊत म्हणाले.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!