AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील..

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा अंदाज वर्तवला आहे. आजही पावसाचा ऑंरेज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला.

पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील..
Maharashtra Rain
| Updated on: Apr 02, 2026 | 7:25 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. राज्यातील काही भागात आज गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसाला पोषक हवामान राज्यात आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज गारपिट आणि पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगाव या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. राज्यातील इतर भागात आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला. उष्णता देखील काही भागात वाढण्याचा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सतत हवामानात बदल होत आहे.

मार्च महिना संपून एप्रिल महिन्याला सुरूवात झाली. मात्र, तरीही पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. पुढील काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. या अवकाळी पावसाने रब्बीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. हाताशी आलेले पिक गेल्याने शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी केली जात आहे.

धाराशिव जिल्ह्यात आज पहाटे पुन्हा अवकाळी पाऊस झाला. धाराशिव, कळंब तालुका वाशी तालुका व तुळजापूर तालुका या परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला असून या पावसानं द्राक्ष आंबा, केळी या फळ पिकासह ज्वारी व काढणीला आलेला गहू देखील मोठ्या प्रमाणात खराब झाला असल्याची माहिती आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या पंधरा-वीस दिवसाच्या कालावधीत सातत्याने अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे.

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर, कारंजा, रिसोड आणि वाशिम तालुक्यात रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊससह काही ठिकाणी गारपीट झाली आहे. या पावसामुळे शेतातील बिजवाई कांदा, गहू आणि ज्वारी पिकांसह आंबा बागांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. वाऱ्याच्या वेगामुळे पिके आडवी पडण्याचा धोका निर्माण झाला असून, काढणीच्या टप्प्यातील पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.