AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हवा घातक, पुढील 24 तास धोक्याचे, हवामान विभागाचा मोठा इशारा, राज्यात थेट…

Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून वायू प्रदूषण हा गंभीर मुद्दा बनलाय. यामुळे आरोग्यावर थेट परिणाम होत आहे. राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता असून थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला.

हवा घातक, पुढील 24 तास धोक्याचे, हवामान विभागाचा मोठा इशारा, राज्यात थेट...
Maharashtra Weather
| Updated on: Jan 04, 2026 | 7:29 AM
Share

देशातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कडाक्याच्या थंडीनंतर अचानक राज्यात वर्षाच्या पहिल्याच दिवसी पाऊस झाला. झपाट्याने वातावरण बदलत आहे. उत्तरेकडून थंडीच्या लाटेचा इशारा दिला असून गारठा वाढणार आहे. उत्तरेकडून राज्यात शीत लहरी येत आहेत आणि पारा अधिकच खाली जाताना दिसत आहे. पुढील दोन ते तीन दिवसात राज्यातही थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून थंडी वाढली. काही भागात अवकाळी पावसाचा इशाराही देण्यात आला. जानेवारी महिना उजाडला असूनही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. मुंबईमध्ये वायू प्रदूषण हा मोठा मुद्दा बनले आहे. मुंबईत प्रचंड वायू प्रदूषण वाढले असून काल रात्री सर्वत्र फक्त आणि फक्त धूळ दिसत होती. आकाशात स्पष्ट काही दिसतही नव्हते. मुंबईतील वायू प्रदूषणाचा थेट परिणाम आरोग्यावर होताना दिसत आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. शिवाय थंडीही वाढेल. जळगाव येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. जळगावात 9.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली त्यानंतर धुळात 9.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. दुसरीकडे जेऊर येथे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सतत हवामानात बदल आणि वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असून सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास, गळ्यात दुखण्याच्या समस्या वाढल्या आहेत. वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने नागरिकांना मास्क घालून फिरण्याचा सल्ला दिला. हेच नाही तर ज्यांना श्वसनाचे आजार आहेत, अशांनी मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असेही म्हटले.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राजधानी दिल्लीतील तापमान 5 जानेवारीपर्यंत आणखी खाली येण्याची शक्यता आहे. तापमान घटत असल्यामुळे हवामान विभागाने दिल्ली-एनसीआरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. थंडीच्या लाटेचा तब्बल पाच राज्यांना इशारा देण्यात आला. केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत किमान तापमानात आणखी 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी दाट धुके पडण्याचीही शक्यता आहे.

Follow Us
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट.
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया.
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार.
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्.
काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?
काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?.
बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात.
'मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव...' आकाश मोरे काय म्
'मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव...' आकाश मोरे काय म्.
पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा
पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा.
धक्कादायक! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतरण, प्रकरण इतकं
धक्कादायक! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतरण, प्रकरण इतकं.
विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत आहात, पण अजित पवार प्रकरणावर...
विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत आहात, पण अजित पवार प्रकरणावर....