AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! या वेळेत घरातबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, आज..

राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात उष्णता वाढणार आहे. नागरिकांनी दुपारच्यावेळी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.

सावधान! या वेळेत घरातबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, आज..
Heat alert
| Updated on: Apr 15, 2026 | 7:16 AM
Share

राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. सध्या राज्यात उष्णता वाढल्याचे बघायला मिळत आहे. अकोला येथे उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोल्यात 43.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. सांगली आणि सोलापूर येथे उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्णता वाढताना दिसत आहे. दुपारी 12 ते 4 दरम्यान शक्यतो नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. यवतमाळ, अमरावती, अकोला, वर्धा, गडचिरोली, परभणी, सोलापूर, जळगाव, वाशिम आणि मालेगाव या जिल्ह्यांमध्ये 42 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झाली. आजही उष्णता वाढणार आहे. शक्यतो दुपारच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. आता राज्याहून अवकाळीचे ढग दूर झाल्याचे बघायला मिळत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात उष्णतेचा पारा चढत असून तापमान थेट 42 अंशांवर पोहोचले आहे. अवघ्या दोन दिवसांत तापमानात 3 अंशांची वाढ झाली आहे. दरवर्षी जिल्ह्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद खामगावात होत असते. उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवरची वर्दळ सुद्धा कमी झाली. हवामान तज्ञांनी पुढील काही दिवसांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद. सोलापुरात काल 42.5 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील आठवडाभर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची लाट असणार आहे. तीव्र उन्हामुळे सोलापूर शहरातील रस्ते दुकाने सामसूम पडले आहेत. नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.

वाशिम जिल्ह्यात पारा बेचाळीशी पार गेला. काल वाशिममध्ये 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाशिम शहरातील मुख्य चौक असलेल्या पाटणी चौकात नेहमी नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, वाढत्या तापमानाचा फटका येथे बघायला मिळतोय. जळगाव जिल्ह्यासह चाळीसगाव तालुक्यात तापमानात मोठी वाढ होत असून पारा तब्बल 41 अंशांवर पोहोचला आहे. वाढत्या उष्णतेमुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः हैराण झाले असून जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी