राज्यात कुणाला टोलमुक्ती? मनसेचं आंदोलन आणि फडणवीस यांचा दावा, काय खरं आणि काय खोटं?

मुंबई प्रवेशावर असलेल्या टोलदरवाढीवरुन मनसे आक्रमक झालीय. राज ठाकरे यांच्या सांगण्यानुसार मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपोषण मागे घेतलं. मात्र, त्याच दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फाद्न्व्सी यांनी टोलबाबत केलेला एक दावाही चर्चेत आलाय.

राज्यात कुणाला टोलमुक्ती? मनसेचं आंदोलन आणि फडणवीस यांचा दावा, काय खरं आणि काय खोटं?
RAJ THACKAREY AND DEVENDRA FADNAVISImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 11:10 PM

मुंबई : 8 ऑक्टोबर 2023 | मुंबई प्रवेशाच्या पाचही टोलनाक्यांवर दरवाढीच्या मुद्द्यावरुन मनसेनं सरकारवर टीका केलीय. मनसे नेते अविनाश जाधव दरवाढी विरोधात उपोषणाला बसले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. विशेष म्हणजे यावर बोलताना राज्याच्या कोणत्याही टोलनाक्यांवर खासगी चार चाकी वाहनांना टोल लागत नसल्याचा अजब दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय.

राज्यातल्या काही नाक्यांवर खासगी चारचाकी वाहनांना टोलमुक्ती आहे. मात्र. इतर अनेक टोलनाक्यांवर चारचाकी गाडीलाही टोल लागतो, हे वास्तव आहे. 2015 मध्ये फडणवीसांचे सरकार असताना काही टोल नाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमुक्ती देण्यात आली आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र, ठराविक टोल नाक्यावर ही टोलमुक्ती आहे, राज्यात इतर टोलनाक्यावर सर्वच वाहनांकडून टोल वसूल केला जातो. त्यामुळे टोलवर केलेला खर्च आणि झालेली वसुली प्रशासनाने जाहीर केली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केलीय.

दहिसर टोल नाका, मुलुंडचा आनंद नगर टोल नाका, मुलुंड-ठाणे मार्गावरील टोलनाका, ठाणे- ऐरोली टोल नाका आणि सायन-पनवेल टोलनाका या पाचही टोलनाक्यांवर सरकारनं दरवाढ केलीय. मात्र, टोलच्या निमित्तानं मनसे पुन्हा सक्रीय झालीय. मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था, मराठी पाट्या, मराठी लोकांना नाकारली जाणारी घरं यानंतर मनसेनं पुन्हा एकदा टोलदरवाढीचा मुद्दा हाती घेतलाय.

हे सुद्धा वाचा

अविनाश जाधव यांच्या उपोषणानंतर राज ठकारे आक्रमक झालेत. अशा कारणामुळे माझा माणूस वाया जाऊ देणार नाही अशी टीका त्यांनी सरकारवर केलीय. एकनाथ शिंदे यांची टोलवरून जी याचिका दाखल केली होती. ती कुणाच्या सांगण्यावरून मागे घेतली असा थेट सवाल त्यांनी केलाय.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राज्यात चार चाकी वाहनांकडून टोल घेतला जात नसल्याचं सांगितलं. यावरून सुप्रिया सुळे यांनी मलाही टोल भरावा लागतो, असा सांगत प्रशासकीय कारभारावर बोट ठेवलंय. टोलच्या संदर्भात शासनाची मानसिकता आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि शिंदे साहेबांची मानसिकता पाहिली तर टोलमुक्ती व्हावी या दिशेने आहे. परंतु सरकार चालवत असताना आणि रस्ते उभा करत असताना शेवटी आर्थिक गणित पण आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.