AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange: पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील मैदानात… मराठा आरक्षणासाठी दिल्लीकडे कूच? तो थेट इशारा

Manoj Jarange Patil Maratha Reservation Agitation: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात फडणवीस सरकारने फसवणूक केल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना केला. गोड बोलून फडणवीस सरकारने विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला.

Manoj Jarange: पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील मैदानात... मराठा आरक्षणासाठी दिल्लीकडे कूच? तो थेट इशारा
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 16, 2026 | 10:16 AM
Share

Manoj Jarange Patil Maratha Reservation Agitation: फडणवीस सरकारकडून वारंवार फसवणूक आणि विश्वासघात झाल्याचा हल्लाबोल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन केल्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नसल्याचे जरांगे म्हणाले. ज्या दिवशी तारीख निश्चित केली, त्यादिवशी आंदोलन होणार असल्याचे ते म्हणाले. 8 महिने उलटून गेले तरीही मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र का दिले नाही असा जळजळीत प्रश्न त्यांनी विचारला. समाजाच्या कल्याणासाठी आता आंदोलनाचा पर्याय असल्याचे ते म्हणाले. शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरणार?

मराठा आंदोलक मनोज जरांगे आज अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. सकाळी १० वाजता ही बैठक होईल. त्यानंतर ते समाजाशी संवाद साधणार असून पुढील आंदोलनाची भूमिका निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. हैदराबाद गॅझेटनुसार ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत, अशा मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सप्टेंबर २०२५ मध्ये आझाद मैदान येथे मनोज जरांगे यांनी आंदोलन केले होते. त्या आंदोलनावेळी सरकारने मागण्या मान्य केल्याचा दावा करत “आपण जिकलो” अशी घोषणा देत जरांगे यांनी आंदोलन स्थगित केले होते.

आंदोलनाची पुन्हा हाक

मात्र, त्यानंतर हैदराबाद गॅझेटचा मराठा समाजाला प्रत्यक्षात ठोस फायदा झालेला नसल्याची भावना समाजात निर्माण झाली. कारण या गॅझेटनुसार 308 नोंदी सापडल्या आहेत. दुसरीकडे शिंदे समितीकडून कुणबी नोंदी शोधण्याचे कामही जवळपास ठप्प झाल्याची परिस्थिती असल्याने मराठा समाजात पुन्हा नाराजी वाढताना दिसत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली होती.

या भेटीचा आणि आजच्या बैठकीचा काही संबंध आहे का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे यांनी अलीकडेच टीका करत नाराजी व्यक्त केली होती.त्यामुळे आजच्या बैठकीत ते मुख्यमंत्री किंवा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतात का?, याकडेही मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागले आहे.

मराठा समाजाची दिल्लीकडे कूच?

मराठा समाजाने राज्यात सगळीकडे मोर्चे काढले. प्रत्येक मोठ्या शहरात, तालुक्याच्या ठिकाणी आणि बाजार गावात मराठा समाजाने आंदोलन केले. वाशी आणि त्यानंतर मुंबईत मराठ्यांचा मोर्चा धडकला. विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा समाजाच्या आंदोलनाला मोठे यश आले. हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थान गॅझेट आणि इतरप्रमाणे कुणबी उल्लेख ग्राह्य धरून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात घेण्याचे निश्चित झाले. पण त्याची अंमलबजावणी अद्यापही न झाल्याने जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज माध्यमांशी बोलताना मराठा समाज दिल्लीकडे कूच करण्याचे संकेत दिले आहेत. 11 वाजेच्या पत्रकार परिषदेत ते काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?