AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur : अगोदर महापौरांनी पाणी पिऊन दाखवले अन् मगच लातुरकरांच्या नळाला स्वच्छ पाणी, महिन्याभरानंतर मिटला प्रश्न

गढूळ आणि पिवळसर पाण्याचे नेमके कारण काय आहे हे शोधून काढण्यासाठी पाईपलाईद्वारे जो पाणीपुरवठा होता तो बंद करण्यात आला होता. शिवाय मांजरा धरणावरील वरचे गेटही उघडण्य़ात आले होते. त्यानंतरच गढूळ पाण्याचे नेमके कारण काय हे समोर आले होते. आता देखील नळाला पाणी सोडल्यानंतर पहिले 20 मिनिट हे पिवळसर पाणी राहणारच आहे. त्यानंतर मात्र, शुध्द पाण्याचा पुरवठा होणार आहे.

Latur : अगोदर महापौरांनी पाणी पिऊन दाखवले अन् मगच लातुरकरांच्या नळाला स्वच्छ पाणी, महिन्याभरानंतर मिटला प्रश्न
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: May 14, 2022 | 4:18 PM
Share

लातूर : गेल्या 30 दिवसांपासून (Latur) लातुरात गढूळ आणि पिवळसर रंगाच्या पाण्याची चर्चा सुरु होती. तब्बल महिनाभर गढूळ (Water Supply) पाणीपुरवठ्याचे नेमके कारण काय हे शोधण्यात (Latur Muncipal) मनपा प्रशासनाची दमछाक झाली होती. अखेर शनिवारी लातुरकरांना शुध्द पाण्याचा पुरवठा झालेला आहे. विशेष म्हणजे लातुरकरांच्या नळाला पाणी सोडण्यापूर्वी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही यासाठी पाणी पिऊन दाखवले. गढूळ पाण्याबरोबर येथील राजकारणही चांगलेच ढवळून निघाले होते. अखेर याला पूर्णविराम मिळाला असून शनिवारी सकाळी शहरातील काही भागात झालेला पाणीपुरवठा हा स्वच्छ असल्याचे दिसून आले.दरम्यानच्या काळात नागरिकांच्या तक्रारी आणि विरोधकांकडून टिकास्त्र यामुळे मनपा प्रशासनाची झोप उडाली होती.

दोन दिवस पाणीपुरवठा होता बंद

गढूळ आणि पिवळसर पाण्याचे नेमके कारण काय आहे हे शोधून काढण्यासाठी पाईपलाईद्वारे जो पाणीपुरवठा होता तो बंद करण्यात आला होता. शिवाय मांजरा धरणावरील वरचे गेटही उघडण्य़ात आले होते. त्यानंतरच गढूळ पाण्याचे नेमके कारण काय हे समोर आले होते. आता देखील नळाला पाणी सोडल्यानंतर पहिले 20 मिनिट हे पिवळसर पाणी राहणारच आहे. त्यानंतर मात्र, शुध्द पाण्याचा पुरवठा होणार आहे. त्याअनुशंगाने काही दिवस अधिकचा काळ पाणी सोडले जाणार असल्याचा निर्णय झाल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले आहे.

पिवळसर पाण्यावरुन राजकारणही

शहरातील नागरिकांना तब्बल 30 दिवस पिवळसर पाणी पुरवठा होतोय हा मुद्दा घेऊन विरोधकांना सत्ताधारी कॉंग्रेसला चांगलेच धारेवर धरले होते. केवळ निषेधच व्यक्त नाही तर पिवळे पाणी घेऊन थेट मनपामध्ये भाजपा पदाधिकारी दाखल झाले होते. तर दुसरीकडे नेमकी समस्या काय आहे याचा उलगडा मनपा प्रशासनाला झाला नव्हता. ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर हा पाण्याचा मुद्दा विरोधकांना मिळाल्याने निवडणुकीची चाहूल लागल्याची जाणीव लातुरकरांना झाली हे मात्र नक्की.

पाणीपुरवठ्याचा कालावधी वाढला

गेल्या महिन्याभरापासून लातुरकरांना गढूळ पाणी पुरवठा होत होता. आगामी काळातही नळाला पाणी सोडल्यापासून 15 ते 20 मिनिट काही प्रमाणात का होईना गढूळ पाणीच येणार त्यामुळे पुढील काही दिवस अधिकचा वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे. दरम्यानच्या काळात लातूरकरांना बोअरच्या पाण्यावर तहान भागवावी लागली होती. त्यामुळे वाढीव वेळेमुळे अधिकच्या पाण्याचा साठा करता येणार आहे.

पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.