AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी भरत कराड… OBC आरक्षणासाठी जीवन संपवलेल्या भरत कराडच्या चिठ्ठीत काय? डोळ्यात पाणी आणणारी चिठ्ठी वाचा

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन मोठा वाद सुरु आहे. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ओबीसी आरक्षणाच्या संभाव्य संपुष्टात येण्याच्या भीतीने स्वत:ला संपवले आहे. त्याने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये नेमकं काय आहे चला जाणून घेऊया...

मी भरत कराड... OBC आरक्षणासाठी जीवन संपवलेल्या भरत कराडच्या चिठ्ठीत काय? डोळ्यात पाणी आणणारी चिठ्ठी वाचा
KaradImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 12, 2025 | 5:04 PM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी करण्याची मागणी आंदोलन करत सरकारकडे केली. या आमरण उपोषणावर तोडगा काढण्यासाठी सरकारने सरकारने हैदराबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी करण्यासाठी मान्यता दिली. तसेच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी देखील मान्य केली आहे. या मागणीमुळे ओबीसींचे असलेले आरक्षण संपुष्टात येईल या भीतीमुळे लातूरमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. या शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक पत्र लिहिले. ते पत्र वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

सुसाईड नोटमध्ये काय?

भरत कराड यांनी मृत्यूपूर्वी एक पत्र चिठ्ठी लिहिली आहे. यामध्ये त्यांनी, मी भरत महादेव कराडे आताच महाराष्ट्र सरकारने समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसींचे कायमस्वरुपी आरक्षण संपवले आहे. मी वेळोवेळी ओबीसी बचाव आंदोलनात सहभाग घेतला होता. तरीही सरकारने ओबीसी समाजाचा घात करुन ओबीसी विरोधी जीआर काढल्यामुळे मी जीवन कायमस्वरुपी संपवत आहे. माझ्या पाठीमागे तरी माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा असे म्हटले आहे. भरत कराड हे फार शिकलेले नव्हते. त्यांनी मुलांच्या वहितील कागद फाडून त्यावर पेनाने लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

वाचा: मुंबई हादरली! जेवणाच्या वादाचा हादरवणारा शेवट, 5 मित्रांनी असा कांड रचला की त्याला आयुष्यातून उठवलं

भरत कराड हे 35 वर्षांचे होते. ते लातूर जिल्हातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात रहात होते. गेल्या कित्येक वर्षांपासून ते शेती करत होते. पण सरकारने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास सुरुवात केल्यानंतर ते चिंतेत होते. त्यांना त्यांच्या मुलांच्या भविष्याची काळजी वाटू लागली होती. भविष्यात आपल्या मुलांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही या कल्पनेनेच ते निराश झाले होते. शेवटची त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

छगन भूजबळांनी घेतली भेट

भरत कराड यांनी स्वत:चे जीवन संपवल्यानंतर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळा आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, आई-वडील असा मोठा परिवार आहे. तसेच त्यांना तीन भाऊ देखील आहेत. ओबीसी आरक्षणाचे प्रमुख नेते छगन भुजबळ यांनी लातूरला जाऊन भरत कराड यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच कुटुंबीयांचे सांत्वन देखील केले.

Follow Us
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब.
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये.